शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील  वीज निर्मिती संच बंदचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:21 AM

राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

एकलहरे : राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. एकलहरे वीज निर्मिती केंद्र व भुसावळ वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद करण्याबाबत महानिर्मिती, महावितरण व दोन खासगी वीज निर्मिती कंपन्यांमध्ये त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार एकलहरे व भुसावळ येथील २१० मेगावॅटचा संच तीन दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला आहे. त्रिपक्षीय करारामध्ये एकलहरे येथील बंद करण्यात आलेल्या संचाचा कोळसा मे. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. व भुसावळ येथील संचाचा कोळसा मे. आयडीयल एनर्जी प्रोजेक्ट्स लि. यांना देऊन त्या दोन्ही खासगी कंपन्यांकडून महावितरणने वीज खरेदी करावी असे ठरले आहे. सुस्थितीत असलेले संच बंद करून खासगी उद्योगांचा फायदा होण्यासाठी राज्य शासनाकडून सदर चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. एमईआरसी व एमओडी यांच्या नियमानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे संच गेल्या दोन वर्षांपासून वीज निर्मितीचे विक्रम मोडत आहे. यामुळे ४.५० रुपये प्रती युनिटपासून ३.२७ रुपये प्रतियुनिट दर झाला आहे. तरीदेखील राज्य शासनाने २१० मेगावॅटचा संच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये प्रचंड संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.  एकलहरे येथील २१० मेगावॅटचा संच बंद करण्याच्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करण्यासाठी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या मंगळवारी दुपारी झालेल्या द्वारसभेत कामगार नेते व्ही.टी. पाटल्ीा, विठ्ठल बागल, राजेंद्र लहामगे, अरविंद वाकेकर, सुरेश चौधरी, सीताराम चव्हाण, गजानन सुपे, सुयोग झुटे, सूर्यकांत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कृती समितीच्या वतीने लवकरच या निर्णयाच्या निषेधार्थ तीव्र लढा उभारण्याचा निर्णय द्वारसभेत एकमताने घेण्यात आला. द्वारसभेला अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, कामगार उपस्थित होते.खासगीकरणाला चालना?एकलहरे व भुसावळ येथील २१० मेगावॅटचे संच सुस्थितीत असतानासुद्धा राज्य शासनाने ते बंद करण्याचा निर्णय घेऊन त्या संचाचा कोळसा दोन खासगी कंपनींना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या दोन खासगी कंपनीकडून महावितरणने वीज खरेदी करावी, असा त्रिपक्षीय करार झाला आहे. राज्य शासनाचे धोरण खासगी-करणाला चालना देत आहे. सुस्थितीत असलेले संच बंद करून खासगी उद्योगांचा फायदा होण्यासाठी राज्य शासनाकडून सदर चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप करीत कामगारांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे.  एमईआरसी व एमओडी यांच्या नियमानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे संच गेल्या दोन वर्षांपासून वीज निर्मितीचे विक्रम मोडत आहे. वीज निर्मिती विक्रमाचे पारितोषिक मिळविणारे केंद्राकडे मात्र शासनाचे वक्रदृष्टी आहे.  ४.५० रुपये प्रति युनिट पासून ३.२७ रुपये प्रति युनिट दर झाला आहे. तरीदेखील राज्य शासनाने २१० मेगावॅटचा संच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये प्रचंड संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज