शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,

By azhar.sheikh | Published: August 14, 2018 2:23 PM

राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे.देशभक्ती ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का?तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागेल!

अझहर शेख नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशप्रेम, देशभक्तीचे भरते आले आहे. ‘डीपी’, ‘प्रोफाईल’, ‘स्टेटस’देखील नेटिझन्सकडून बदलले जात आहेत.राष्ट्रभक्तीचा हा उत्साह वाखाण्याजोगा नक्कीच आहे; मात्र यासोबत आपल्या राष्ट्राचे आपण आदर्श नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. आपण साधा सिग्नलदेखील अनेकदा पाळत नाही, तर मग आपल्या देशाभिमानाला काय अर्थ राहतो? हे तरुणाईने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन वगळता अन्य दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम, देशाविषयीची आपुलकी, करुणा का आठवत नाही? देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कर्तव्याच्या माध्यमातून कधी पार पाडणार आहोत? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहिलेला आहे.देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. केवळ स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रप्रेम मनात जागृत न करता हे राष्ट्रप्रेम वर्षाचे बारामहिने जागृत ठेवण्याचीराष्ट्रउभारणीसाठी गरजेचे आहे.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्र सण आहेत. या तारखांना आपण सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतो अन् देशप्रेमाचा बेभान होऊन विसरतो. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी १५ आॅगस्टला बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपरचा कचराही सर्रासपणे पर्यटनस्थळांवर फेकून घरी परततो. कचऱ्याची विल्हेवाटदेखील योग्यरित्या लावू शकत नाही? राष्ट्रप्रेम, देशभक्ती केवळ  ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का? याचा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. आपण आपल्यापासून जर बदल घडविला तर आपोआप समाज बदलेल मात्र नेमके समाज बदलत नाही, तर आपण का बदलायचे असा विचार मनात आणला जातो आणि तेथेच गल्लत होते व राष्ट्रउभारणीचे काम मागे पडते.

एक आदर्श भारतीय नागरिक बनण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करु आणि आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणू तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सार्थकी लागेल!

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNational Flagराष्ट्रध्वजIndiaभारत