शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,

By azhar.sheikh | Updated: August 14, 2018 14:29 IST

राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे.देशभक्ती ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का?तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागेल!

अझहर शेख नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशप्रेम, देशभक्तीचे भरते आले आहे. ‘डीपी’, ‘प्रोफाईल’, ‘स्टेटस’देखील नेटिझन्सकडून बदलले जात आहेत.राष्ट्रभक्तीचा हा उत्साह वाखाण्याजोगा नक्कीच आहे; मात्र यासोबत आपल्या राष्ट्राचे आपण आदर्श नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. आपण साधा सिग्नलदेखील अनेकदा पाळत नाही, तर मग आपल्या देशाभिमानाला काय अर्थ राहतो? हे तरुणाईने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन वगळता अन्य दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम, देशाविषयीची आपुलकी, करुणा का आठवत नाही? देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कर्तव्याच्या माध्यमातून कधी पार पाडणार आहोत? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहिलेला आहे.देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. केवळ स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रप्रेम मनात जागृत न करता हे राष्ट्रप्रेम वर्षाचे बारामहिने जागृत ठेवण्याचीराष्ट्रउभारणीसाठी गरजेचे आहे.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्र सण आहेत. या तारखांना आपण सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतो अन् देशप्रेमाचा बेभान होऊन विसरतो. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी १५ आॅगस्टला बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपरचा कचराही सर्रासपणे पर्यटनस्थळांवर फेकून घरी परततो. कचऱ्याची विल्हेवाटदेखील योग्यरित्या लावू शकत नाही? राष्ट्रप्रेम, देशभक्ती केवळ  ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का? याचा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. आपण आपल्यापासून जर बदल घडविला तर आपोआप समाज बदलेल मात्र नेमके समाज बदलत नाही, तर आपण का बदलायचे असा विचार मनात आणला जातो आणि तेथेच गल्लत होते व राष्ट्रउभारणीचे काम मागे पडते.

एक आदर्श भारतीय नागरिक बनण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करु आणि आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणू तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सार्थकी लागेल!

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNational Flagराष्ट्रध्वजIndiaभारत