शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,

By azhar.sheikh | Updated: August 14, 2018 14:29 IST

राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे.देशभक्ती ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का?तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागेल!

अझहर शेख नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशप्रेम, देशभक्तीचे भरते आले आहे. ‘डीपी’, ‘प्रोफाईल’, ‘स्टेटस’देखील नेटिझन्सकडून बदलले जात आहेत.राष्ट्रभक्तीचा हा उत्साह वाखाण्याजोगा नक्कीच आहे; मात्र यासोबत आपल्या राष्ट्राचे आपण आदर्श नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. आपण साधा सिग्नलदेखील अनेकदा पाळत नाही, तर मग आपल्या देशाभिमानाला काय अर्थ राहतो? हे तरुणाईने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन वगळता अन्य दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम, देशाविषयीची आपुलकी, करुणा का आठवत नाही? देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कर्तव्याच्या माध्यमातून कधी पार पाडणार आहोत? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहिलेला आहे.देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. केवळ स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रप्रेम मनात जागृत न करता हे राष्ट्रप्रेम वर्षाचे बारामहिने जागृत ठेवण्याचीराष्ट्रउभारणीसाठी गरजेचे आहे.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्र सण आहेत. या तारखांना आपण सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतो अन् देशप्रेमाचा बेभान होऊन विसरतो. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी १५ आॅगस्टला बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपरचा कचराही सर्रासपणे पर्यटनस्थळांवर फेकून घरी परततो. कचऱ्याची विल्हेवाटदेखील योग्यरित्या लावू शकत नाही? राष्ट्रप्रेम, देशभक्ती केवळ  ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का? याचा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. आपण आपल्यापासून जर बदल घडविला तर आपोआप समाज बदलेल मात्र नेमके समाज बदलत नाही, तर आपण का बदलायचे असा विचार मनात आणला जातो आणि तेथेच गल्लत होते व राष्ट्रउभारणीचे काम मागे पडते.

एक आदर्श भारतीय नागरिक बनण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करु आणि आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणू तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सार्थकी लागेल!

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNational Flagराष्ट्रध्वजIndiaभारत