शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

... म्हणून मतदानाला दांडी मारली, छगन भुजबळांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 22:50 IST

येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात मतदान झालं. राजकीय पक्षातील सर्वच नेतेमंडळींनी मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मतदानाला दांडी मारली. भुजबळ दिवसभर आपल्या मतदारसंघात फिरत प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. पण, त्यांनी मतदानच केलं नाही, हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. 

“येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर जाऊन-येऊन पाच तास म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक सुरु असल्याने मतदारसंघामध्ये थांबणेही महत्वाचे होते. आमचे मतदारसंघही मोठे-मोठे होते. त्यामुळे मतदानाला जाणं शक्य नाही,” असे भुजबळ यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्टीकरण दिलंय. 

नाशिकमध्ये मी जास्तीत जास्त फिरलो. नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांपैकी 12 जागा तरी आम्हाला कमीत कमी मिळतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. एक्झिट पोल काहीही येवो, यावेळी निश्चितपणे सरकार बदलेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल, असा विश्वासही भुजबळांनी बोलून दाखवला. दरम्यान, भुजबळांनी मतदानाला दांडी मारल्याची वृत्त येताच, त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात आली.

 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसVotingमतदानPankaj Bhujbalपंकज भुजबळNashikनाशिकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019