शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:17 IST

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी : प्रदूषण मंडळाने कारवाई करूनही परिस्थिती अद्याप जैसे थेच...

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणाने आसपासच्या बालक, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाला आहे. रात्री अपरात्री कंपनीमधून यंत्राचा मोठा आवाज येत असल्याने त्यापासून नागरिकांची झोप मोड होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नागरी वसाहतीतील नागरिकांनी ग्रामपंचायत विल्होळी, अधीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातपूर यांना निवेदन दिले. कंपनी मधून येणारा विषारी वायू व मोठे आवाज त्वरित बंद करण्यात यावेत, त्यामुळे आरोग्य धोका निर्माण होवू शकतो. कंपनीने याबाबत यावायूसाठी उंच चिमणी उभारावी, सदर ठिकाणी कमी आवाज येईलअशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात यावा, कुठलेही रसायन अथवा साहित्य जमिनीत मुरणार नाही याची दक्षता घ्यावी, कारखान्यास असलेले छत नादुरु स्त असून त्यातून विषारी वायू बाहेर पडतो ते तात्काळ दुरु स्त करावे, लॉक डाऊन नियमांचे पालन करावे अशा प्रकारची निवेदन ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाला देऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरी सुद्धा प्रदूषण मुक्त विषारी वायू बाहेर पडत असून नागरी वसाहतीतील धोका निर्माण होत आहे.परिसरातील कंपनीमधून विषयुक्त वायू बाहेर पडत असून त्यामुळे नागरी वसाहतीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदन दिले आहे. नागरिकांच्या तक्र ारी नुसार त्वरित कंपनी मालकास नोटीस पाठविण्यात आली असून सदर विषारी युक्त निघणाºया धुराचा बंदोबस्त करावा असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबतची तक्र ार प्रदूषण नियंत्रण महामंडळास करण्यात आली आहे.- बळीराम पगार, ग्रामविकास अधिकारी विल्होळी.आम्ही राहत असलेल्या ठिकाणी कारखान्यांमधून येणारा विषारी वायू व आवाज बंद व्हावा यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करावी. व परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तो थांबावा यासाठी ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाने पुढाकार घ्यावा.- ज्ञानेश्वर मते, नागरिक. (फोटो ०९ विल्होळी,१)

 

टॅग्स :Smokingधूम्रपानHealthआरोग्य