शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत फुटीर ठरू शकतात सहा वर्षेे अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:48 IST

महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

नाशिक : महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.महापालिकेचा इतिहास बघितला तर पहिले अडीच वर्षे सर्वकाही सुरळीत चालते. मात्र अखेरचे अडीच वर्षे अथवा दोन वर्षे फाटाफुटीत जातात. तीन वर्षे सत्ता पद मिळाले नाही किंवा अन्याय झाला असे कारण दिले जाते. शेवटचे दोन वर्षे फाटाफूट झाल्यानंतरदेखील पक्षांतर करून अनेकांना पुन्हा दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, आता कायद्यानुसार अशाप्रकारे पक्षादेश न पाळणे सोपे राहिलेले नाही. महाराष्टÑ प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांच्या अनार्हता प्रकरणात या तरतुदी आहेत. त्यानुसार पक्षादेशाचा भंग करून मतदान केल्यास त्यांना गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. पक्षाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून अपात्र ठरवले जाते आणि त्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही अशी कायदेशीर माहिती महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या सूत्रांनी दिली.महापालिकेत मनसेची सत्ता असताना या पक्षाचेच दोन नगरसेवक दुसºया महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जाऊन मिळाले होते, त्यांना मनसेच्या वतीने पक्षादेश देताना त्यांच्या निवासस्थानी चिटकवण्यात आला होता. कायदेशीर तरतुदीनुसार वृत्तपत्रातदेखील तो जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर मनसेने कारवाई केल्यानंतर दोन नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले होते. पक्षादेश पाळून मत देण्यासाठी सभागृहातच हजर राहिले नाही तर काय होते असादेखील अनेक नगरसेवकांचा प्रश्न आहे. मात्र पक्षादेश घरावर चिटकवण्यापासून तो वृत्तपत्रात देईपर्यंत अनेक प्रकारच्या तरतुदी असल्याने फाटाफूट सोपी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.गट स्थापण्याची तरतूदच रद्दपूर्वी एखाद्या पक्षाच्या एक तृतीयांश संख्येने नगरसेवक दुसरा गट स्थापन करू शकत होते आणि ते पाहिजे तो निर्णय घेऊ शकत होते. परंतु आता मात्र गट स्थापन करण्याची तरतूदच काढण्यात आली आहे. २००६ मध्ये महापालिका अधिनियमातूनही तरतूद आघाडी सरकारने काढली आणि महापालिकेतील घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक