शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

निवडणुकीत फुटीर ठरू शकतात सहा वर्षेे अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:48 IST

महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

नाशिक : महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.महापालिकेचा इतिहास बघितला तर पहिले अडीच वर्षे सर्वकाही सुरळीत चालते. मात्र अखेरचे अडीच वर्षे अथवा दोन वर्षे फाटाफुटीत जातात. तीन वर्षे सत्ता पद मिळाले नाही किंवा अन्याय झाला असे कारण दिले जाते. शेवटचे दोन वर्षे फाटाफूट झाल्यानंतरदेखील पक्षांतर करून अनेकांना पुन्हा दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, आता कायद्यानुसार अशाप्रकारे पक्षादेश न पाळणे सोपे राहिलेले नाही. महाराष्टÑ प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांच्या अनार्हता प्रकरणात या तरतुदी आहेत. त्यानुसार पक्षादेशाचा भंग करून मतदान केल्यास त्यांना गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. पक्षाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून अपात्र ठरवले जाते आणि त्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही अशी कायदेशीर माहिती महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या सूत्रांनी दिली.महापालिकेत मनसेची सत्ता असताना या पक्षाचेच दोन नगरसेवक दुसºया महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जाऊन मिळाले होते, त्यांना मनसेच्या वतीने पक्षादेश देताना त्यांच्या निवासस्थानी चिटकवण्यात आला होता. कायदेशीर तरतुदीनुसार वृत्तपत्रातदेखील तो जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर मनसेने कारवाई केल्यानंतर दोन नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले होते. पक्षादेश पाळून मत देण्यासाठी सभागृहातच हजर राहिले नाही तर काय होते असादेखील अनेक नगरसेवकांचा प्रश्न आहे. मात्र पक्षादेश घरावर चिटकवण्यापासून तो वृत्तपत्रात देईपर्यंत अनेक प्रकारच्या तरतुदी असल्याने फाटाफूट सोपी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.गट स्थापण्याची तरतूदच रद्दपूर्वी एखाद्या पक्षाच्या एक तृतीयांश संख्येने नगरसेवक दुसरा गट स्थापन करू शकत होते आणि ते पाहिजे तो निर्णय घेऊ शकत होते. परंतु आता मात्र गट स्थापन करण्याची तरतूदच काढण्यात आली आहे. २००६ मध्ये महापालिका अधिनियमातूनही तरतूद आघाडी सरकारने काढली आणि महापालिकेतील घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक