शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

निवडणुकीत फुटीर ठरू शकतात सहा वर्षेे अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:48 IST

महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

नाशिक : महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाणार असल्याने आता असा धोका किती नगरसेवक पत्करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.महापालिकेचा इतिहास बघितला तर पहिले अडीच वर्षे सर्वकाही सुरळीत चालते. मात्र अखेरचे अडीच वर्षे अथवा दोन वर्षे फाटाफुटीत जातात. तीन वर्षे सत्ता पद मिळाले नाही किंवा अन्याय झाला असे कारण दिले जाते. शेवटचे दोन वर्षे फाटाफूट झाल्यानंतरदेखील पक्षांतर करून अनेकांना पुन्हा दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, आता कायद्यानुसार अशाप्रकारे पक्षादेश न पाळणे सोपे राहिलेले नाही. महाराष्टÑ प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांच्या अनार्हता प्रकरणात या तरतुदी आहेत. त्यानुसार पक्षादेशाचा भंग करून मतदान केल्यास त्यांना गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. पक्षाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून अपात्र ठरवले जाते आणि त्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही अशी कायदेशीर माहिती महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या सूत्रांनी दिली.महापालिकेत मनसेची सत्ता असताना या पक्षाचेच दोन नगरसेवक दुसºया महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जाऊन मिळाले होते, त्यांना मनसेच्या वतीने पक्षादेश देताना त्यांच्या निवासस्थानी चिटकवण्यात आला होता. कायदेशीर तरतुदीनुसार वृत्तपत्रातदेखील तो जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर मनसेने कारवाई केल्यानंतर दोन नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले होते. पक्षादेश पाळून मत देण्यासाठी सभागृहातच हजर राहिले नाही तर काय होते असादेखील अनेक नगरसेवकांचा प्रश्न आहे. मात्र पक्षादेश घरावर चिटकवण्यापासून तो वृत्तपत्रात देईपर्यंत अनेक प्रकारच्या तरतुदी असल्याने फाटाफूट सोपी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.गट स्थापण्याची तरतूदच रद्दपूर्वी एखाद्या पक्षाच्या एक तृतीयांश संख्येने नगरसेवक दुसरा गट स्थापन करू शकत होते आणि ते पाहिजे तो निर्णय घेऊ शकत होते. परंतु आता मात्र गट स्थापन करण्याची तरतूदच काढण्यात आली आहे. २००६ मध्ये महापालिका अधिनियमातूनही तरतूद आघाडी सरकारने काढली आणि महापालिकेतील घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक