शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उच्चांकी तपमानाने सिन्नरकरांची काहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 6:03 PM

सिन्नर: तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली होत असल्याचे चित्र आहे.

चैत्र महिना सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यातील तपमानचा पारा चढल्याने नागरिकांचे हाल होत आहे. सकाळी शहर व ग्रामीण भागात दिसणारी गर्दी दुपारी ११ वाजेनंतर कमी होते. उन्हाच्या दाहकतेमध्ये अचानक वाढ झाल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाणातही घट होत आहे. दुचाकी चालविणारे सनकोट, टोप्या, हातमोझे घालून फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला थंड पेय, सरबते पिण्यासाठी आणि टरबूजाच्या गार गार फोडी खाण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. तपमानात वाढ झाल्याने रात्रीच्यावेळीही नागरिकांना गरम होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर छतावर गरगरनारे पंखे गरम हवा फेकत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना घराबाहेर झोपण्याची वेळ आली आहे. शेतकरी लवकर शेतात जावून दुपारपर्यंत कामे उरकून सावलीचा आधार घेतात. तर जनावरे चारणा-या गुराख्यांना कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो. वैशाख महिन्याला प्रारंभ होण्यास आणखी आठवड्याचा अवधी असतांनाच पेटलेल्या वणव्यामुळे नागरिकांची  काहिली होत आहे.