शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

यंदा कांदा उत्पादन वाढीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:23 IST

लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे कांदा खरेदी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्देआर्थिक फटका बसण्याची शक्यता : निर्यात खुली न केल्यास डोकेदुखी वाढणार

लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे कांदा खरेदी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनापर्यंत वाढणार असल्याचे केंद्रीय फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. यामुळे देशांतर्गत गरजेच्या तुलनेत कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरीप आणि लेट खरीप मिळून ५५ लाख टन, तर रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तसेच राज्यातील कांदा बाजारपेठेत आवक लक्षणीय होत आहे. तसेच देशातल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे तेथील मागणी कमी झाली आहे. तसेच या वर्षी प्रथमच महाराष्ट्राइतकीच कांदा आवक गुजरात राज्यातदेखील होत आहे. दक्षिणेकडील राज्यातील कांदा दिल्ली, हरियाणा, पंजाब व पश्चिम बंगालमध्ये तेथील कांदा स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा मागणी कमी होत असल्याने भाव कमी झाले आहेत.नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अनुक्र मे खरीप आणि रेट खरीप कांदा बाजारात असतो. खरीप कांद्यात टिकवण क्षमता नसते. हार्वेस्टिंगनंतर तातडीने त्याची विक्र ी करावी लागते. रब्बी कांद्यात टिकवण क्षमता असते. पारंपरिक कांदा चाळीत सहा ते आठ महिने रब्बी कांदा साठवता येतो. या वर्षी उत्पादनवाढीची मोठी समस्या ही रब्बी कांद्यात निर्माण होणार आहे. आजघडीला बाजारात लेट खरीप कांद्याची आवक होत आहे. यंदा लेट खरिपाचे (रांगडा) उत्पादन कमी असल्याने सध्याचे बाजारभाव फेब्रुवारी २०१९ तुलनेत किफायतीशीर आहेत. लेट खरिपाचा कांदा मार्चच्या मध्यापर्यंत बाजारात सुरू असतो.मागील वर्षी हंगामात १८-१९ मध्ये रब्बी कांद्याखाली७.६ लाख हेक्टर क्षेत्र होते, त्या तुलनेत हंगाम १९-२० मध्ये उच्चांकी नऊ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढण्याचे अनुमान आहे. म्हणजेच, १८ टक्क्यांनी रब्बी कांद्याखालील क्षेत्र वाढणार आहे. यंदाच्या खरिपातदेखील पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगाप लागणी वाढतील. गेल्या खरिपातील तेजीमुळे यंदाच्या खरिपातही कांद्याकडे शेतकऱ्यांचे कल राहील, असे दिसते. भारतात दरमहा दोन ते तीन लाख टनापर्यंत कांदा निर्यात क्षमता विकसित झाली आहे. मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांत सरासरी अडीच लाख टन कांदा निर्यात झाला तरी ३२ लाख टन वाढीव उत्पादनामधून २० लाख टनाचा वाढीव उत्पादकांचा कांदा देशाबाहेर जाईल, असा अंदाज आहे.साधारणपणे मार्च ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान देशात रब्बी कांद्याचा पुरवठा असतो. मार्च महिन्यात लेट खरीप (रांगडा) आणि आगाप रब्बी (उन्हाळ) एकाच वेळी हार्वेस्टिंगला येऊन महाराष्ट्रासह देशभरातील बाजार समित्यांमध्ये माल येण्याची शक्यता आहे. या बरोबरच फेब्रुवारीतही लेट खरिपाच्या पुरवठ्यात सुधारणा होऊन जानेवारीच्या तुलनेत सरासरी बाजारभाव कमी राहण्याची शक्यता दिसते.

 

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी