शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

सायखेड्यात कांदा भिजलापावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:39 IST

सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसायखेड्यात कांदा भिजला पावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला आहे. कमी पाणी, मुरमाड जमीन यामुळे या भागात लाल कांदा लागवड जुलै, आॅगस्ट महिन्यात केली जात असते. त्या भागातील कांदा काढणीला वेग आला असताना अस्मानी संकटामुळे शेतात काढून पडलेला कांदा आणि काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी लागल्यामुळे कांदा खराब झाला आहे. शेतातच कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सलग तीन वर्षे बेभाव विक्र ी केलेल्या कांद्याला यंदा दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडाळी येथील शेतकरी संदीप सातपुते यांचा एक एकर कांदे तीन दिवसांपासून शेतात काढून पडले आहेत. लाल कांदा काढणीचा हंगाम सुरू होऊन बाजारात दाखल झाला होता.आर्थिक संकटडांगसौंदाणे : परिसरात मंगळवारी पहाटे पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर व पाऊस सुरू होता. परिणामी द्राक्ष उत्पादक व नव्याने उन्हाळ कांदा लागवड केलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेल्या मालाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गारव्यामुळे तयार द्राक्षबागेचा फटका बसून मोठे नुकसान होणार असून, नव्याने लागवड झालेला उन्हाळ कांदाही बुरशीजन्य रोगांना बळी पडणार आहे, तर खरिपाचा कापणी करून पडलेला मका व चारा या पावसामुळे खराब होणार आहे. डांगसौंदाणे आठवडे बाजार असल्याने बाहेरगावहूनआलेले व्यापारी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले, तर पावसामुळे बाजारात कोणीही हजेरी न लावल्यामुळे गजबजणारे बाजार आवार सुनसान दिसत होते. भाजीपाला विक्रीसाठी आलेले व्यापारी व शेतकºयांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. खामखेडा परिसरातशेतकरी हवालदिलखामखेडा : ओखी वादळामुळे झालेल्या पावसाचा तडाखा जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, पिळकोस, भादवन, विसापूर आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याबरोबर लाल कांद्याचेउत्पादन घेतले जाते. कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. चालू वर्षी उशिरा पावसामुळे लालकांद्याची लागवड उशिरा झालीहोती.गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव मिळत होता. त्यामुळे लाल कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल या आशेनेलाल कांद्याचे पीक चांगल्यापैकी आले होते.उत्पादनात घटमंगळवारी सकाळी अचानक तुरळक पावसाला सुरुवात झाली. परंतु दुपारी जोरात पाऊस सुरू झाल्याने शेतात काढून मार्केटसाठी तयार केलेला आणि नुकताच काढलेला कांदा पावसात भिजला. या पावसामुळे भिजून गेलेला कांदा खराब होऊन उत्पादनात घट होणार आहे तर जो जमिनीत आहे तो या बेमोसमी पावसामुळे जमिनीतच खराब होतो की काय याची चिंता आता शेतकºयाला सतावत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा