शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सायखेड्यात कांदा भिजलापावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:39 IST

सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसायखेड्यात कांदा भिजला पावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला आहे. कमी पाणी, मुरमाड जमीन यामुळे या भागात लाल कांदा लागवड जुलै, आॅगस्ट महिन्यात केली जात असते. त्या भागातील कांदा काढणीला वेग आला असताना अस्मानी संकटामुळे शेतात काढून पडलेला कांदा आणि काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी लागल्यामुळे कांदा खराब झाला आहे. शेतातच कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सलग तीन वर्षे बेभाव विक्र ी केलेल्या कांद्याला यंदा दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडाळी येथील शेतकरी संदीप सातपुते यांचा एक एकर कांदे तीन दिवसांपासून शेतात काढून पडले आहेत. लाल कांदा काढणीचा हंगाम सुरू होऊन बाजारात दाखल झाला होता.आर्थिक संकटडांगसौंदाणे : परिसरात मंगळवारी पहाटे पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर व पाऊस सुरू होता. परिणामी द्राक्ष उत्पादक व नव्याने उन्हाळ कांदा लागवड केलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेल्या मालाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गारव्यामुळे तयार द्राक्षबागेचा फटका बसून मोठे नुकसान होणार असून, नव्याने लागवड झालेला उन्हाळ कांदाही बुरशीजन्य रोगांना बळी पडणार आहे, तर खरिपाचा कापणी करून पडलेला मका व चारा या पावसामुळे खराब होणार आहे. डांगसौंदाणे आठवडे बाजार असल्याने बाहेरगावहूनआलेले व्यापारी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले, तर पावसामुळे बाजारात कोणीही हजेरी न लावल्यामुळे गजबजणारे बाजार आवार सुनसान दिसत होते. भाजीपाला विक्रीसाठी आलेले व्यापारी व शेतकºयांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. खामखेडा परिसरातशेतकरी हवालदिलखामखेडा : ओखी वादळामुळे झालेल्या पावसाचा तडाखा जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, पिळकोस, भादवन, विसापूर आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याबरोबर लाल कांद्याचेउत्पादन घेतले जाते. कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. चालू वर्षी उशिरा पावसामुळे लालकांद्याची लागवड उशिरा झालीहोती.गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव मिळत होता. त्यामुळे लाल कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल या आशेनेलाल कांद्याचे पीक चांगल्यापैकी आले होते.उत्पादनात घटमंगळवारी सकाळी अचानक तुरळक पावसाला सुरुवात झाली. परंतु दुपारी जोरात पाऊस सुरू झाल्याने शेतात काढून मार्केटसाठी तयार केलेला आणि नुकताच काढलेला कांदा पावसात भिजला. या पावसामुळे भिजून गेलेला कांदा खराब होऊन उत्पादनात घट होणार आहे तर जो जमिनीत आहे तो या बेमोसमी पावसामुळे जमिनीतच खराब होतो की काय याची चिंता आता शेतकºयाला सतावत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा