शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

सिद्धार्थनगर झोपडपट्टी बनले समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:23 AM

येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी समस्यांचे आगार बनले आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या स्थापनेनंतर हळूहळू रोजगारासाठी आलेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या.

एकलहरे : येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी समस्यांचे आगार बनले आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या स्थापनेनंतर हळूहळू रोजगारासाठी आलेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या. वसाहत दिवसेंदिवस वाढत जाऊन एकलहरे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक एक म्हणून या झोपडपट्टीची ओळख निर्माण झाली.येथील नागरिकांना वीज, पाणी, स्वच्छताग्रह, समाजमंदिर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. कालांतराने येथे सिद्धार्थनगर, इंदिरानगर, साठेनगर, पहाडीबाबानगर, देशमुखवाडी, हनुमाननगर, कन्नडवाडी आदी छोट्या मोठ्या वस्त्या निर्माण झाल्या. एकलहरे वीज केंद्राच्या राखेमुळे अनेक व्यावसायिकांनी आपला मोर्चा एकलहरेकडे वळविला. यानिमित्ताने किरणा, हॉटेल, भाजीपाला, रिक्षा व्यवसाय वाढला.व्यावसायिक स्पर्धेतून काही अवैध धंदे व त्यानिमित्ताने गुन्हेगारीतही वाढ झाली. देशी दारु दुकानाबरोबरच अवैध दारू विक्री अनेक ठिकाणी सुरु झाली. यामुळे गुन्हेगारी वाढली आहे़ त्यामुळे छेडछाडीच्या तसेच, भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत़त्यातच वाहतुकीची समस्या वाढली आहे़ एकलहरे वीज केंद्रातून राख वाहतूक करणारे काही ट्रकचालक सिद्धार्थनगर चौकातील गर्दीचा विचार न करता बिनदिक्कतपणे वाहन चालवितात. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.येथील देशमुखवाडी परिसरात अनेक राखेच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. रस्त्यावर उभ्या असलेल्या या गाड्या अर्धा रस्ता व्यापून टाकतात. काही व्यावसायिक स्पर्धेतून, काही छेडछाडीतून, काही विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंदही पोलिसांकडे आहेत. देशी दारुचा सुळसुळाट झाल्याने अनेकांचे संसार उद््ध्वस्त झाले आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीतील झोपडपट्ट्यांसारखे आॅलआउट आॅपरेशन एकदा एकलहरे झोपडपट्टीत राबविण्याची गरज आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले.(उद्याच्या अंकातइंदिरानगर, गाळुंशी, गंगापूरगाव)एकलहरे परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून काही वाद-विवाद सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. गंभीर स्वरु पाचे गुन्हे सोडले तर काही वाद आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाहेरच मिटविले जातात. एवढे करु नही सद्यस्थितीत एकलहरेत व विषेशत: झोपडपट्टीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा आदेश काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या ठिकाणी अवैध धंदे सर्रासपणे केले जात आहेत. पोलीस प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक