शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:40 AM

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देतर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राला उभारी मिळावी याकरिता केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था वाचली असून जर सरकारने हे पाऊल उचलले नसते तर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती आणि सरकारलाही राजीनामा द्यावा लागला असता असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी केले.आनंदवल्ली पाइप लाइनरोडवरील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यात शनिवारी (दि.२६) ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी उपस्थित होते.शिवप्र्रताप शुक्ल म्हणाले, सरकारी बँकांचा देशातील बँकिंग क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. पूर्वी बँकिंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास होता. आज परिस्थिती बदलली असून खात्यावरचे पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरून बँकांचा विश्वास उडत चालला असून कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढले आहेत. नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची फसवणूक झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ही व्यवस्था सावरण्यासाठीच केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींचे पॅकेज देऊ केल्याचे सांगतानाच पॅकेज दिले नसते तर बँक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून, स्पर्धेच्या युगाला तोंड देताना बँकांना आपली विश्वसनीयता पुन्हा निर्माण करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.या अधिवेशनासाठी देशभरातून संघटनेचे १२०० प्रतिनिधी उपस्थित असून, या दोन दिवसीय अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी यांचे वेतनकरार, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध, बँकांचे विलिनीकरण थांबवणे आणि दि. ३० व ३१ मे रोजीच्या संपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.पीएनबी घोटाळ्याचे खापर ब्रँच अधिकाऱ्यावरपंजाब नॅशनल बँके चा घोटाळा बँकेच्या ब्रँच अधिकाºयामुळे झाल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी घोटाळ्याचे खापर शाखेच्या व्यवस्थापकावर फोडले. प्रत्यक्षात गैरव्यवहार झाल्यानंतर तीन ते चार वर्षांनी समोर आला. त्यामळे वरिष्ठ अधिकाºयांसह सनदी लेखापाल व शासकीय यंत्रणांविषयीही साशंकता असताना शुक्ल यांनी अधिवेशनात या घोटाळ्यात पीएनबीच्या संबंधित शाखेच्या व्यवस्थापकामुळे हा घोटाळा झाल्याचे सांगितले.