शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
3
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
7
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
8
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
9
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
10
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
11
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
13
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
14
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
15
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
16
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
17
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
18
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
19
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:40 IST

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देतर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राला उभारी मिळावी याकरिता केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था वाचली असून जर सरकारने हे पाऊल उचलले नसते तर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती आणि सरकारलाही राजीनामा द्यावा लागला असता असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी केले.आनंदवल्ली पाइप लाइनरोडवरील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यात शनिवारी (दि.२६) ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी उपस्थित होते.शिवप्र्रताप शुक्ल म्हणाले, सरकारी बँकांचा देशातील बँकिंग क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. पूर्वी बँकिंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास होता. आज परिस्थिती बदलली असून खात्यावरचे पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरून बँकांचा विश्वास उडत चालला असून कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढले आहेत. नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची फसवणूक झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ही व्यवस्था सावरण्यासाठीच केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींचे पॅकेज देऊ केल्याचे सांगतानाच पॅकेज दिले नसते तर बँक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून, स्पर्धेच्या युगाला तोंड देताना बँकांना आपली विश्वसनीयता पुन्हा निर्माण करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.या अधिवेशनासाठी देशभरातून संघटनेचे १२०० प्रतिनिधी उपस्थित असून, या दोन दिवसीय अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी यांचे वेतनकरार, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध, बँकांचे विलिनीकरण थांबवणे आणि दि. ३० व ३१ मे रोजीच्या संपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.पीएनबी घोटाळ्याचे खापर ब्रँच अधिकाऱ्यावरपंजाब नॅशनल बँके चा घोटाळा बँकेच्या ब्रँच अधिकाºयामुळे झाल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी घोटाळ्याचे खापर शाखेच्या व्यवस्थापकावर फोडले. प्रत्यक्षात गैरव्यवहार झाल्यानंतर तीन ते चार वर्षांनी समोर आला. त्यामळे वरिष्ठ अधिकाºयांसह सनदी लेखापाल व शासकीय यंत्रणांविषयीही साशंकता असताना शुक्ल यांनी अधिवेशनात या घोटाळ्यात पीएनबीच्या संबंधित शाखेच्या व्यवस्थापकामुळे हा घोटाळा झाल्याचे सांगितले.