शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:40 IST

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देतर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राला उभारी मिळावी याकरिता केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था वाचली असून जर सरकारने हे पाऊल उचलले नसते तर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती आणि सरकारलाही राजीनामा द्यावा लागला असता असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी केले.आनंदवल्ली पाइप लाइनरोडवरील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यात शनिवारी (दि.२६) ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी उपस्थित होते.शिवप्र्रताप शुक्ल म्हणाले, सरकारी बँकांचा देशातील बँकिंग क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. पूर्वी बँकिंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास होता. आज परिस्थिती बदलली असून खात्यावरचे पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरून बँकांचा विश्वास उडत चालला असून कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढले आहेत. नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची फसवणूक झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ही व्यवस्था सावरण्यासाठीच केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींचे पॅकेज देऊ केल्याचे सांगतानाच पॅकेज दिले नसते तर बँक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून, स्पर्धेच्या युगाला तोंड देताना बँकांना आपली विश्वसनीयता पुन्हा निर्माण करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.या अधिवेशनासाठी देशभरातून संघटनेचे १२०० प्रतिनिधी उपस्थित असून, या दोन दिवसीय अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी यांचे वेतनकरार, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध, बँकांचे विलिनीकरण थांबवणे आणि दि. ३० व ३१ मे रोजीच्या संपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.पीएनबी घोटाळ्याचे खापर ब्रँच अधिकाऱ्यावरपंजाब नॅशनल बँके चा घोटाळा बँकेच्या ब्रँच अधिकाºयामुळे झाल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी घोटाळ्याचे खापर शाखेच्या व्यवस्थापकावर फोडले. प्रत्यक्षात गैरव्यवहार झाल्यानंतर तीन ते चार वर्षांनी समोर आला. त्यामळे वरिष्ठ अधिकाºयांसह सनदी लेखापाल व शासकीय यंत्रणांविषयीही साशंकता असताना शुक्ल यांनी अधिवेशनात या घोटाळ्यात पीएनबीच्या संबंधित शाखेच्या व्यवस्थापकामुळे हा घोटाळा झाल्याचे सांगितले.