शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीवाडी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:16 IST

: शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनियमित स्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

इंदिरानगर : शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनियमित स्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.नंदिनी नदीच्या कडेला वसलेल्या शिवाजीवाडीत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सुरुवातीला बोटावर मोजण्याइतक्या झोपड्या होत्या. परंतु शहराच्या विस्तारात शिवाजीवाडीचाही विस्तार झाला. आज अनेक झोपड्या याठिकाणी वसल्या असून, सुमारे पाच ते सहा हजार लोकांची वस्ती आहे. मात्र लोकवस्तीच्या मानाने याठिकाणी सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. या भागात अद्यापही गटारी उघड्या असल्याने व त्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्यामुळे या उघड्या गटारीच्या घाण व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने गटारी तुडुंब भरून घाण पाणी घराघरांत शिरते त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अनियमित स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे येथे वारंवार साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शिवाजीवाडीला लागूनच म्हाडाने तेथे इमारती उभारल्या असून, सुमारे पंधरा वर्षांपासून ही घरे अर्धवट स्थितीत पडून आहेत. तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे म्हाडाची घरे पूर्ण होऊ शकली नाहीत. या अर्धवट घरांमुळे दगड- धोंडे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले तसेच या घरांचा वापर गैरकृत्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.गरीब व हातावर पोट भरणाºया नागरिकांना रोजगारासाठी सकाळपासूनच घरातून बाहेर पडावे लागते. अशा वेळी सार्वजनिक शौचालयाची संख्या अपुरी पडते तसेच नियमित स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाडीदेखील नियमित येत नसल्याने व कचरा साठवण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या या भागाकडे मनपाचे दुर्लक्ष झाले असून, त्याचबरोबर अनेक प्रश्नही याठिकाणी उपस्थित झाले आहेत. अवैध धंदे, व गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.(उद्याच्या अंकात  गरवारे वसाहत, अंबड)

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक