पुरस्कारार्थींनी समाज सुदृढतेचे काम करावे शिवाजीराव मोघे

By Admin | Updated: August 2, 2014 01:26 IST2014-08-01T23:11:04+5:302014-08-02T01:26:09+5:30

: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण

Shivajirao Moghe, a performer working for the betterment of the society | पुरस्कारार्थींनी समाज सुदृढतेचे काम करावे शिवाजीराव मोघे

पुरस्कारार्थींनी समाज सुदृढतेचे काम करावे शिवाजीराव मोघे

 नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या सुधारणेसाठी घालविले. त्यामुळे आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी पुरस्कार मिळाले म्हणजे काम संपले असे न समजता समाज सृदृढ करण्यासाठी सातत्याने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
येथील कालिदास कलामंदिरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २०१४-१५ च्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, आयुक्त रणजितसिंह देओल, सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, धुळे जि. प. अध्यक्ष सरला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे पुस्तक जगातील २७ भाषांत लिहिले गेले आहे. ते मैलोन्मैल पायी प्रवास करून मुंबईला आले. त्यात अंत:करणात व मनात देवत्व
होते.
पिढयान् पिढ्या रंजलेल्या व गांजलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी दरवर्षी ७५ कोटींची तरतूद करण्यात येते. लहूजी साळवे आयोगाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी विकास योजना राबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
एकाच वेळी सहा शिष्यवृत्त्या आॅनलाइन देण्यात येऊन त्याचे लाभार्थी ३२ लाख विद्यार्थी आहेत. मागासवर्गीयांसाठी या तीन वर्षांत राज्यात सव्वादोन लाख घरकुले बांधलीत. जादूटोणा विधेयकास मंजुरी दिली. तसेच ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी काम संपले म्हणून थांबू नये, तर समाज सृदृढ करण्याचे काम केले पाहिजे.
छगन भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्राला दृष्ट्या आणि क्रांतिकारी नेत्यांची परंपरा आहे. या परंपरेतील रत्नांमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण कमी असतानाही शब्दरूपी निखाऱ्यांतून त्यांनी उपेक्षित समाजामध्ये संघर्षाची जिद्द निर्माण केली. उपेक्षित माणूस ताठ मानेने उभा राहिला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.
यावेळी राज्यमंत्री संजय सावकारे व सचिव आर. डी. शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजीराव पाटील यांनी शाहिरी पोवाडे म्हटले. (प्रतिनिधी)

Web Title: Shivajirao Moghe, a performer working for the betterment of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.