शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

शिवाजीनगर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 11:42 IST

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने ...

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या तरी कोणी? असा प्रश्न पडलेला आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पेंशन योजना, निराधार योजना तसेच गावातील अंगणवाडीमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आदि विविध प्रश्न भेडसावत आहेत. लहान मुले आहारापासून वंचित राहत असल्याचे सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले. गावामध्ये रु ग्णवाहिका नसल्याने नागरिकांना रात्री अपरात्री काही दुखापत झाल्यास त्याला रु ग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंचायतीजवळ तसेच गावात कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने परवड होते. गावात पंचायतीला स्वत:ची हक्काची एकही इमारत नाही, गावात पिण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, महिलांना रोज उठून लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते. यावेळी सरपंचासोबत आलेल्या इतर ग्रामस्थांनीही गावातली समस्येचा पाढा वाचला, गरोदर माता बालकांचा पोषण आहार तोही थोड्या दिवसांपुरता मिळतो आणि नंतर बंद होतो. नियमित आहार मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRural Developmentग्रामीण विकास