शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:59 IST

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला.

नाशिक : एरव्ही सनातन धर्मावर कुणी बोललं की त्याला जाब विचारला जातो. मग तुमच्याच पक्षातील एक मंत्री हिंदू धर्मात शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा कुणीच का बोलत नाही. भाजपमध्ये शंकराचार्यांचा अवमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्थान असेल तर मग तुम्ही सनातन धर्म मानता की नाही, असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान काय, हे इतरांना सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. यावेळी त्यांनी धर्मावर अधर्माचे संकट आल्याने ‘दार उघड, बये दार उघड’ असे जगदंबा मातेला साकडे घालत सभेला सुरुवात केली. श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय असून राममंदिरासाठी शिवसेनेचे योगदान मोठे असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.

२०१४ला शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्नबाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे काय करणार, असा विचार करत दिल्लीत शिवसेनेला संपविण्याचा विचार झाला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यावेळी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. भाजपने दिलेले वचन मोडलं नाहीतर फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर