शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

शिवसेना म्हणते यंदा कोणतीही लाट नाही

By श्याम बागुल | Updated: April 18, 2019 14:45 IST

२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा मुक्त संवाद : निवडणुकीत कस लागणार

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही, कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याच प्रमाणे २०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.

नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरूवारी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधान पदासाठी इच्छूक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छूक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते, निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी, पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीए मध्ये सर्व पक्षांनी एकत्र येवून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्यावर बोलताना राऊत यांनी, मोदी यांच्या सर्व सभा राजकीय असल्यामुळे ते ज्या राज्यात जातात तेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील असे सांगून राऊत यांनी, १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात जात, धर्माचा विषय तर येणारच असे सांगितले. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. रिपार्इंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येवून रालोआत सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा