शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Political Crisis: “बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी PM मोदींकडे मांडावी”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:13 IST

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असून, ठाकरे सरकार गेल्यापासून बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार वाढल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाशिक: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. हे नवे सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले आहे, त्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पुन्हा एकदा नव्या सरकारवर टीकास्त्र सोडत महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे. तसेच बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी मागणी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर दिल्ली दौरा केला. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी होत आहेत. याचसंदर्भात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा नव्या सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री दिल्लीत हायकमांडच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीत ते हायकमांडच्या भेटीला गेलेले आहेत. शिवसेनेचे हायकमांड मुंबईतच असतात. कुणी म्हणत असेल, शिवसेनेचे सरकार आहे, तर त्यांनी लक्षात घ्यावे की, शिवसेनेचे हायकमांड मातोश्री आहे, दिल्ली नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला जात नाही. यापूर्वीही कधी गेला नाही. त्यामुळे सगळ्यांचे मुखवटे गळून पडतायत, या शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला. 

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करावी

सीमाभागातून पुन्हा बातम्या यायला सुरुवात झाली आहे, तेथील मराठी लोकांवर परत नव्याने अत्याचार सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी लोकांवर अत्याचार होत आहे, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत तो संपूर्ण भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मांडावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही राऊत यांनी केले. 

दरम्यान, बेळगावचे स्थानिक शिष्टमंडळ मला भेटून गेले. तेथील परिस्थिती गंभीर आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेल्यापासून कसा त्रास सुरू झालाय, याबाबत त्यांनी मला सांगितले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस