शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:43 IST

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतमाल विकून रिकाम्या हातानेच परतले शेतकरी

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.शेतकरी कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने शेतात वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा या पिकांना फाटा देऊन जळगाव नेऊर येथील राहुल ठोंबरे या शेतकऱ्याने २२ गुंठे क्षेत्रावर 'आशा' या वाणाची सिमला मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून साधारणपणे आतापर्यंत रोपे, तार, बांबू , मल्चिंग पेपर, औषधे, खते असा साधारणपणे ७० ते ८० हजार रुपये खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे ५० व्या दिवसानंतर शिमला मिरची सुरू झाली. मागील हप्त्यात अकरा किलोच्या क्रेटला ११५ रुपयांचा भाव मिळाला, त्यात मजुरी व भाडे सुटले होते.पण बुधवारी (दि.१८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १७५ क्रेट शिमला मिरची नेली असता एका क्रेटला अवघा ३५ रुपये भाव मिळाला. म्हणजे तीन रुपये किलो. त्याचे ६१२५ रुपये झाले, त्यात पाचशे पंचवीस रुपये हमाली जाता शेतकऱ्याच्या पदरात पाच हजार ५९९ रुपये पडले. त्यात गाडीभाडे ३००० व तोडण्यासाठी एका क्रेटला दहा रुपये असे ४,७५० रुपये खर्च आलेला असताना शेतकऱ्याला मात्र ८४९ रुपयांवर समाधान मानावे लागले.कोरोना संकटानंतर शेतकऱ्यांपुढे भाजीपाला पिकांची मातीमोल भावाने विक्री हे मोठे संकट उभे राहिले आहे. त्या पैशातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडावे व कोणती पिके घ्यावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.भाजीपाला फेकून देण्याची वेळशेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या थोड्याफार पाण्यावर शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गिलके, काकडी, कोथिंबीर अशी पिके घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या भाजीपाल्याचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलेला आहे.यावर्षी साठवलेल्या पाण्यावर इतर पिकांकडे दुर्लक्ष करून शिमला मिरचीची लागवड केली. मोठ्या मेहनतीने मिरचीची निगा राखली. परंतु आता मिळत असलेल्या भावातून केलेला खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उसनवारीने आणलेले पैसे कसे फेडावे, हा प्रश्न उभा आहे. - राहुल ठोंबरे, शेतकरी(१८ मिरची, १८ पावती)

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी