शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:43 IST

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतमाल विकून रिकाम्या हातानेच परतले शेतकरी

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.शेतकरी कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने शेतात वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा या पिकांना फाटा देऊन जळगाव नेऊर येथील राहुल ठोंबरे या शेतकऱ्याने २२ गुंठे क्षेत्रावर 'आशा' या वाणाची सिमला मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून साधारणपणे आतापर्यंत रोपे, तार, बांबू , मल्चिंग पेपर, औषधे, खते असा साधारणपणे ७० ते ८० हजार रुपये खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे ५० व्या दिवसानंतर शिमला मिरची सुरू झाली. मागील हप्त्यात अकरा किलोच्या क्रेटला ११५ रुपयांचा भाव मिळाला, त्यात मजुरी व भाडे सुटले होते.पण बुधवारी (दि.१८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १७५ क्रेट शिमला मिरची नेली असता एका क्रेटला अवघा ३५ रुपये भाव मिळाला. म्हणजे तीन रुपये किलो. त्याचे ६१२५ रुपये झाले, त्यात पाचशे पंचवीस रुपये हमाली जाता शेतकऱ्याच्या पदरात पाच हजार ५९९ रुपये पडले. त्यात गाडीभाडे ३००० व तोडण्यासाठी एका क्रेटला दहा रुपये असे ४,७५० रुपये खर्च आलेला असताना शेतकऱ्याला मात्र ८४९ रुपयांवर समाधान मानावे लागले.कोरोना संकटानंतर शेतकऱ्यांपुढे भाजीपाला पिकांची मातीमोल भावाने विक्री हे मोठे संकट उभे राहिले आहे. त्या पैशातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडावे व कोणती पिके घ्यावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.भाजीपाला फेकून देण्याची वेळशेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या थोड्याफार पाण्यावर शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गिलके, काकडी, कोथिंबीर अशी पिके घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या भाजीपाल्याचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलेला आहे.यावर्षी साठवलेल्या पाण्यावर इतर पिकांकडे दुर्लक्ष करून शिमला मिरचीची लागवड केली. मोठ्या मेहनतीने मिरचीची निगा राखली. परंतु आता मिळत असलेल्या भावातून केलेला खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उसनवारीने आणलेले पैसे कसे फेडावे, हा प्रश्न उभा आहे. - राहुल ठोंबरे, शेतकरी(१८ मिरची, १८ पावती)

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी