शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:43 IST

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतमाल विकून रिकाम्या हातानेच परतले शेतकरी

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.शेतकरी कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने शेतात वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा या पिकांना फाटा देऊन जळगाव नेऊर येथील राहुल ठोंबरे या शेतकऱ्याने २२ गुंठे क्षेत्रावर 'आशा' या वाणाची सिमला मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून साधारणपणे आतापर्यंत रोपे, तार, बांबू , मल्चिंग पेपर, औषधे, खते असा साधारणपणे ७० ते ८० हजार रुपये खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे ५० व्या दिवसानंतर शिमला मिरची सुरू झाली. मागील हप्त्यात अकरा किलोच्या क्रेटला ११५ रुपयांचा भाव मिळाला, त्यात मजुरी व भाडे सुटले होते.पण बुधवारी (दि.१८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १७५ क्रेट शिमला मिरची नेली असता एका क्रेटला अवघा ३५ रुपये भाव मिळाला. म्हणजे तीन रुपये किलो. त्याचे ६१२५ रुपये झाले, त्यात पाचशे पंचवीस रुपये हमाली जाता शेतकऱ्याच्या पदरात पाच हजार ५९९ रुपये पडले. त्यात गाडीभाडे ३००० व तोडण्यासाठी एका क्रेटला दहा रुपये असे ४,७५० रुपये खर्च आलेला असताना शेतकऱ्याला मात्र ८४९ रुपयांवर समाधान मानावे लागले.कोरोना संकटानंतर शेतकऱ्यांपुढे भाजीपाला पिकांची मातीमोल भावाने विक्री हे मोठे संकट उभे राहिले आहे. त्या पैशातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडावे व कोणती पिके घ्यावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.भाजीपाला फेकून देण्याची वेळशेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या थोड्याफार पाण्यावर शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गिलके, काकडी, कोथिंबीर अशी पिके घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या भाजीपाल्याचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलेला आहे.यावर्षी साठवलेल्या पाण्यावर इतर पिकांकडे दुर्लक्ष करून शिमला मिरचीची लागवड केली. मोठ्या मेहनतीने मिरचीची निगा राखली. परंतु आता मिळत असलेल्या भावातून केलेला खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उसनवारीने आणलेले पैसे कसे फेडावे, हा प्रश्न उभा आहे. - राहुल ठोंबरे, शेतकरी(१८ मिरची, १८ पावती)

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी