शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘कळसूबाई’ अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरू; राजूरच्या कोथळे ‘देवराई’त संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 01:05 IST

आदिवासींचे मोलाचे योगदान

- अझहर शेख नाशिक : सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात ‘भीमाशंकर’पाठोपाठ अकोले तालुक्यातील राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यातसुद्धा राज्यप्राणी शेकरूवाढत आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना नियमित गस्तीदरम्यान सुमारे ७० शेकरू प्रत्यक्षरीत्या नजरेस पडले आहेत.

नाशिक वन्यजीव विभागातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांनी ‘देवराई’च्या माध्यमातून वृक्षसंवर्धन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारदराजवळील घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, कुमशेत, साम्रद भागांसह राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे देवराईत शेकरूंचा अधिवास वाढत आहे.

कोथळे देवराईमध्ये हिरडा, बेहडा, जांभूळ, आंबा, करंज, भेरलीमाड, सादडा, उंबर यासारख्या वृक्षप्रजाती चांगल्याच बहरल्या आहेत. या जंगलात शेकरू या मोठ्या खारूताईचा अधिवास सुरक्षित होत असल्याने संख्या वाढताना दिसत आहे.

दोन वर्षांपूर्वी दहा ते पंधरांच्या संख्येने असलेल्या शेकरूंमध्ये आता चांगली वाढ झाली आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना प्रत्यक्षपणे ७० शेकरू या भागातील वृक्षांच्या फांद्यांवर फिरताना आढळून आले असल्याचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.

कोरोनामुळे यंदा प्रगणनेला ‘ब्रेक’

कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नाशिक वन्यजीव विभागाने दरवर्षीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात केली जाणारी शेकरूची शिरगणना यावर्षी खंडित केली. त्यामुळे शेकरूंच्या घरट्यांची मोजदाद केली गेली नाही; मात्र नियमित गस्तीदरम्यान वनरक्षक, वनमजुरांनी केलेल्या निरीक्षणातून शेकरूंचा अधिवास अधिकाधिक सुरक्षित होत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक