शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 21:12 IST

Sharad Pawar: ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. शेजारचे देश आपल्यासोबत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar: आपला पक्ष गांधी-नेहरु विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच रात्री लगेच चीनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये होते. यावेळी उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केले.  केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीला भाव नाही. कांदा निर्यातीवर बंधने आहेत. एवढा मोठा जिल्हा असताना या शेतकऱ्यांची नाशिक जिल्हा बँक आजारी आहे. प्रचंड थकबाकी झाली आहे. केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित

पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहे. बांगलादेश उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने प्रयत्न केले होते. तो आपल्यासोबत नाही, श्रीलंका आपल्यासोबत नाही. देशाची धुरा पंतप्रधान मोदींच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिकच एक वैशिष्ट म्हणजे उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. शेतीवर नाशिककरांचे लक्ष आहे. आधुनिक शेतीचा विचार करणारा हा शेतकरी आहे. नवनवीन प्रयोग इथ पाहायला मिळतात. कांद्याचे, सोयाबीनचे उत्पन्न करणारा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याला जोडधंदा हा दुधाचा आहे. शेतीतील गोष्टी आपण अमेरिकेकडून घ्यायला लागलो तर शेती अडचणीत येईल. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर अवघड आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक