शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी.

नाशिक- अवकाळी पावसामुळे शेतकाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज नाशिकमधील शेतकऱ्यांना दिली.वणी-कळवण रस्त्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली, बाळू गांगोडे या शेतकऱ्याने सोयाबीनचे उद्धवस्त झालेले पीक भरल्या डोळ्याने पवार यांना दाखवताच उपस्थितांचे मन हेलावले, बाजरीच्या कणसांना फुटलेले कोंब, काळे पडलेले सोयाबीनच्या शेंगा, मनी गळून पडलेले द्राक्ष पाहून पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सवांद साधत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांची साक्ष काढली, यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या साऱ्या व्यथा कथन करताना जिल्हा बँक, राष्ट्रीकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, उलट बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्याचे सांगून बजावलेल्या नोटिसा दाखवल्या. ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला व त्यांची नवे यादीत आले अशा शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देण्यास दारा पुढे उभे करीत नसल्याचे सांगितले, तर पंचनामे करण्यासाठी आलेले तलाठी 30 टक्क्यांनी कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करीत असल्याची तक्रार केली. यावेळी पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कळवण तालुक्यातील माहिती घेतली, गेल्या दोन दिवसात पंधरा टक्के पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले, येत्या आढवड्यात पंचनामे पूर्ण झाले की त्याचा अहवालात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली, त्यावर झालेले नुकसान खूपच आहे, आम्ही सरकारकडे ते मांडू पण तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी विचारणा त्यांनी केली, त्यावर शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले सर्व नुकसान मिळावे, कर्ज माफी व्हावी अशी मागणी केली,

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी