शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

हरिहर गड सर करणाऱ्या सत्तर वर्षीय आजींची कोरोनावरही मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर ...

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड

सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात

व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु

दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास

यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन

मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र,

त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांना भीती वाटते आणि त्यामुळे त्यांच्या

प्रकृतीवर अधिकच परिणाम होतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग

झाला तरी धक्का बसतो; परंतु आशा आंबाडे यांनी मात्र आपल्यावरील या

संकटाला न घाबरता तोंड दिले. गेल्या २० मार्च रोजी खरे तर त्यांनी

कोराेना प्रतिबंधकात्मक लस घेतली आणि त्यानंतर त्यांना ताप आला.

सुरुवातीला लसीचा डाेस घेतल्याने साईडइफेक्ट असतील म्हणून डॉक्टरांच्या

सल्ल्यानेच त्यांनी उपचारासाठी गोळ्या घेतल्या. मात्र, ताप उतरत नाही हे बघितल्यानंतर मात्र

कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे त्यांनी कोराेना चाचणी केली. त्यात

त्या पॉझिटिव्ह निघाल्या; पण डगमगल्या नाहीत. डॉक्टरांनी त्यांच्या

ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी लक्ष

ठेवले जेव्हा ऑक्सिजन लेव्हल ८८ झाली. तेव्हा मात्र कुटुंबीयांनी खासगी

रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस ऑक्सिजनवर ठेवावे लागले; परंतु नंतर

ऑक्सिजनची लेव्हल वाढली आणि त्यांना लगेचच पाचव्या दिवशी डिस्चार्च

मिळाला; परंतु यादरम्यान त्यांचे धाकटे चिरंजीव संजय हे पॉझिटिव्ह झाले.

त्यांच्यापाठोपाठ थोरले बंधू ॲड. मनोज आंबाडे हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संजय यांंच्या पत्नी सुजाता आणि मृण्मयी व मृगांश ही दोन मुले तसेच मनोज यांच्या पत्नी तनुजा तसेच वेदिका आणि वेदांत ही दोन अपत्ये

असे सर्वच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले; परंतु

सर्वांनीच भीतीने घाबरून न जाता कोरोनावर निश्चित मात करू,

अशीच जिद्द बाळगली आणि सर्वच कुटुंब कोरोनामुक्त झाले.

इन्फो...

गड सर करणाऱ्या व्हायरल आजी

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात

सर्व आंबाडे कुटुंबीय सहलीसाठी हरिहर गड येथे गेले. त्यावेळी आशाबाई या

गड चढतील, असे कोणाला वाटलेे नव्हते. मात्र, त्यांनीही गड चढण्याची तयारी

दर्शवली आणि कुटुंबीयांनी साथ दिली. त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभरात अनेक

माध्यमांत व्हायरल झाला. आंबाडे कुटुंबीय अलीबाग येथील असून नाशिकमध्ये सुमारे पन्नास वर्षांपासून स्थायिक आहेत. दुगाव येथे त्यांची शेती असून आशाबाई १९९५-९६ पासून शेतीत काम करतात. आता वयामुळे त्या तेथे जात नसल्या

तरी घरातही सतत काही ना काही कामात व्यस्त असतात. योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने

त्या पंधरा ते वीस आसने आणि प्राणायम नियमित करतात. मुलांना आणि विशेष

करून नातंवडांना आसने शिकवून त्या करवून घेतात. एकत्रित कुटुंब आणि तेथील

सकारात्मक वातावरण ही मोठी ऊर्जा असल्याचे आशाबाई सांगतात.

-------------------

छायाचित्र आर फोटोवर ०२ आंबाडे फॅमीली नावाने.