शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

नाणेगावच्या शेतकऱ्यांचl सातबारा रेल्वे प्रशासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:05 IST

नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनाशिक-पुणे रेल्वे मार्ग : शेतकऱ्यांची विरोधात घोषणाबाजी

देवळाली कॅम्प : नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नायगाव, जायगाव मार्गे पाच वर्षापूर्वीच ठरला होता. मात्र मागील वर्षापासून नव्याने आखणी करताना नाशिकरोडमार्गे विहितगाव, बेलतगव्हाण, देवळाली कॅम्प, नानेगाव, वडगाव या गावांच्या मार्गाने रेल्वेचा प्रस्तावित मार्ग ठरवला आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व्हेसाठी पाठविलेल्या कामगारांना नानेगाव ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते.तसेच ग्रामसभा घेत जिल्हा प्रशासनाला रेल्वे मार्गात सर्व बागायती क्षेत्र जाणार असल्याचे कळवून पूर्वी ठरलेल्या व रेल्वेने हस्तांतरित केलेल्या मार्गानेच रेल्वे मार्ग नेण्याबाबत कळविले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान सदर रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम थांबल्याने नानेगाव ग्रामस्थ निश्चिंत झाले, पण शुक्रवारी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाºयांनी १२५ पेक्षा जास्त सातबारे उतारे नानेगाव तलाठी कार्यालयातून घेऊन गेल्याचे समजताच ग्रामस्थ तलाठी कार्यालयाजवळ एकत्र आलेहोते.यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ग्रामस्थांनी एकत्र राहून रेल्वे मार्गाचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनकरण्याचा निश्चय करण्यात आला. रेल्वे मार्गाला विरोध बळकट करण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा वडगावपर्यंतचा आराखडा दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणानाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा यापूर्वी सर्व्हे करताना दहा वर्षांत रेल्वे प्रशासनाने नायगावमार्गे सिन्नरच्या इंडिया बुल्सपर्यंत ज्या जागा रेल्वेकडे अधिग्रहित करण्यात आल्या त्या मार्गानेच रेल्वे जाणार असल्याचे सांगितले होते. असे सांगणाºयांमध्ये रेल्वेबरोबरच राजकीय नेतेही होते. निवडणुकी दरम्यान निवडणूक लढविणाºया उमेदवाराने गिरणारे येथे भाषण करताना नव्याने रेल्वेचा मार्ग अंतिम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गावानुसार भाषण बदलणाºया नेत्यांचा दुटप्पीपणा यानिमित्ताने उघडकीस आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीrailwayरेल्वे