शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नाणेगावच्या शेतकऱ्यांचl सातबारा रेल्वे प्रशासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:05 IST

नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनाशिक-पुणे रेल्वे मार्ग : शेतकऱ्यांची विरोधात घोषणाबाजी

देवळाली कॅम्प : नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नायगाव, जायगाव मार्गे पाच वर्षापूर्वीच ठरला होता. मात्र मागील वर्षापासून नव्याने आखणी करताना नाशिकरोडमार्गे विहितगाव, बेलतगव्हाण, देवळाली कॅम्प, नानेगाव, वडगाव या गावांच्या मार्गाने रेल्वेचा प्रस्तावित मार्ग ठरवला आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व्हेसाठी पाठविलेल्या कामगारांना नानेगाव ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते.तसेच ग्रामसभा घेत जिल्हा प्रशासनाला रेल्वे मार्गात सर्व बागायती क्षेत्र जाणार असल्याचे कळवून पूर्वी ठरलेल्या व रेल्वेने हस्तांतरित केलेल्या मार्गानेच रेल्वे मार्ग नेण्याबाबत कळविले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान सदर रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम थांबल्याने नानेगाव ग्रामस्थ निश्चिंत झाले, पण शुक्रवारी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाºयांनी १२५ पेक्षा जास्त सातबारे उतारे नानेगाव तलाठी कार्यालयातून घेऊन गेल्याचे समजताच ग्रामस्थ तलाठी कार्यालयाजवळ एकत्र आलेहोते.यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ग्रामस्थांनी एकत्र राहून रेल्वे मार्गाचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनकरण्याचा निश्चय करण्यात आला. रेल्वे मार्गाला विरोध बळकट करण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा वडगावपर्यंतचा आराखडा दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणानाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा यापूर्वी सर्व्हे करताना दहा वर्षांत रेल्वे प्रशासनाने नायगावमार्गे सिन्नरच्या इंडिया बुल्सपर्यंत ज्या जागा रेल्वेकडे अधिग्रहित करण्यात आल्या त्या मार्गानेच रेल्वे जाणार असल्याचे सांगितले होते. असे सांगणाºयांमध्ये रेल्वेबरोबरच राजकीय नेतेही होते. निवडणुकी दरम्यान निवडणूक लढविणाºया उमेदवाराने गिरणारे येथे भाषण करताना नव्याने रेल्वेचा मार्ग अंतिम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गावानुसार भाषण बदलणाºया नेत्यांचा दुटप्पीपणा यानिमित्ताने उघडकीस आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीrailwayरेल्वे