शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जुने नाशिकमध्ये सात तास वीजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:11 IST

जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे

ठळक मुद्देवीजतारा भुमीगत करण्याची जुनी मागणी ही समस्या अर्धा तास किंवा एक तास नव्हे तर तब्बल सहा ते सात तास कायमदर पाच ते दहा मिनिटांनी वीजपुरवठा खंडीत-सुरळीत

नाशिक : उन्हाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सोमवारी (दि.१२) शहराच्या कमाल तपमानाचा पारा थेट ३६ अंशाच्या पुढे सरकला होता. त्यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत असल्याने अंगाची काहिली होत होती, अशा स्थितीत सकाळपासून जुने नाशिक गावठाण परिसरात वीजेचा लपंडाव सुरू होता.जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे. वीजतारा भुमीगत करण्याची जुनी मागणी कायमस्वरुपी प्रलंबित आहे. याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची असलेली उदासिनता कमी होत नसल्याने नाराजी नागरिकांमध्ये कायम आहे; मात्र दुसरीकडे वीजपुरवठाया भागात सुरळीत केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपुर्वी संपुर्ण जुने नाशिकमधील वीजपुरवठा रात्री अचानकपणे बंद झाला होता. यावेळी नागरिकनी भद्रकाली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली होती. यावेळी दुध बाजारमधील मौला बाबा दर्गाजवळील रोहित्रामध्ये बिघाड होऊन संपुर्ण परिसरात अंधार पसरला होता. यावेळी वायर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वीजपुरवठा सुरळीत करण्यास असमर्थता महावितरणकडून दर्शविण्यात आली होती. यावेळी कोकणीपुरा भागातील एक जागरूक नागरिकाने वाढत्या उष्म्याला कंटाळून घरामध्ये ठेवलेली वायर काढून देत कर्मचा-यांना त्वरित दुरूस्ती करण्यास सांगितले. सुमारे अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने जुने नाशिककरांना शुक्रवारची रात्र जागून काढण्याची आलेली वेळ टळली. या समस्येला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या नाशकात वीजेचा लपंडाव सुरू होता. दर पाच ते दहा मिनिटांनी वीजपुरवठा खंडीत-सुरळीत होत असल्यानेआश्चर्य व्यक्त केले जात होते. ही समस्या अर्धा तास किंवा एक तास नव्हे तर तब्बल सहा ते सात तास कायम राहिली.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी हवीमहावितरणकडून भोंगळ कारभार जुने नाशिक भागात थांबवावा आणि जुनाट वीजतारा, फ्यूज, रोहित्रांवरील जुने साहित्य बदलण्याची मागणी होत आहे. सातत्याने वीजपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याबरोबर वीजेचाही वापर वाढतो. घरामधील पंखे, कुलर, फ्रिज अशा उपकरणांचा वापर सर्वाधिकरित्या नागरिकांकडून केला जातो. त्यामुळे महावितरण प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन