शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नाशिक महापालिकेत सेंट्रल किचनच्या वेगळ्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:20 IST

नाशिक- सेंट्रल किचनच्या निमित्ताने नाशिक महापालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. वाद असावेत त्यातून उणिवाही बाहेर पडल्यानेच घोळही स्पष्ट होत आहेत. अशाप्रकारच्या वादांमागे ठेकेदार असतात हे खरे असले तरी सेंट्रल किचनचा वाद हा विद्यार्थी हिताचा हवा तरच वाद उपयुक्त ठरेल.

ठळक मुद्देप्रशासन- लोकप्रतिनिधींवरून मतभेदठेक्यावरून नव्हे विद्यार्थी केंद्रीत लक्ष असावे

संजय पाठक, नाशिक- सेंट्रल किचनच्या निमित्ताने नाशिक महापालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. वाद असावेत त्यातून उणिवाही बाहेर पडल्यानेच घोळही स्पष्ट होत आहेत. अशाप्रकारच्या वादांमागे ठेकेदार असतात हे खरे असले तरी सेंट्रल किचनचा वाद हा विद्यार्थी हिताचा हवा तरच वाद उपयुक्त ठरेल.

शालेय विद्यार्थ्यांकरता पोषण आहार देण्याची योजना जुनी असली तरी त्यात गेल्यावर्षी केलेले बदल हे जणू ठेकेदार केंद्रीत आहेत. राज्य शासनाने ऐन लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत सेंट्रल किचनसाठी निविदा मागवल्याचा घाट घातला तेव्हाच खरे तर शंकेची पाल चुकचुकली होती. कारण, त्यापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये सेंट्रल किचन योजना राबविण्यासाठी राज्यशासनाने अट्टहास केला तेव्हा इस्कॉनच्या धर्तीवर एकच ठेकेदार संपुर्ण शहरासाठी असेल आणि त्यातून अत्यंत हायजनिक अन्न मिळेल अशी अपेक्षा होती. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे यासंदर्भात सुरू असलेला प्रयोग बघून त्याच धर्तीवर नाशिकमध्ये काय करता येईल त्याचा अभ्यास करण्याचे तत्कालीन महापौर रंजना भानसी यांनी जाहिर केले होते. मात्र, लोकसभेच्या दरम्यान एक नव्हे तर तेरा सेंट्रल किचनचा घाट घालताना मात्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाचे नाव पुढे करण्यात आले आणि व्हायचे तेच झाले. या योजनेत आता जास्तीत जास्त पुरावठादार सामाविष्ट करण्याच्या नावाखाली तेरा ठेकेदार निवडण्यात आले.

शहरातील बहुतांशी राजकिय मंडळी आणि त्यांच्या नजीकच्या कार्यकर्त्यांना हे काम देण्यात आले. त्यातून वादाला तोंड फुटले. जर जास्तीत जास्त पुरवठादार यात सहभागी होण्यासाठी शासन आणि सर्वाच्च न्यायालयाने अटी शर्ती शिथील करण्याचे आदेश शासनाने दिले तरी त्यात नेमके तेरा आणि तेही आजी माजी आमदार किंवा राजकिय नेत्यांचे सर्व ठेके कसे काय पात्र ठरले हा वादाचा पहिला मुद्दा होता.

तथापि, अशाप्रकारे ठेका मिळाल्यानंतरही शासनाचे असलेले सर्व आदेश धाब्यावर बसविण्यात आले हा दुसरा वादाचा मुद्दा होता. शासनाने सेंट्रल किचन कसे असावे, सुरक्षीता कशी बाळगावी, शाळेत त्याचे वितरण करण्यासाठी पॅक बंद गाड्या कशा असाव्या अशा अनेक प्रकारचे नियम आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. तेथील उणिवा देखील भरपूर होत्या आणि त्याच्या तक्रारी करून देखील उपयोग झाला नव्हता. त्यातून महासभेत वादळी चर्चा झाली आणि आयुक्तांना देखील घोळा विषयी शंका होती. त्यामुळे त्यांनी चौकशी देखील आरंभली होती. मात्र त्यानंतर देखील महासभेने तेरा ठेके रद्द करण्याचा घेतलेला निर्णय शासनाकडे विखंडनासाठी पाठविला आणि त्यातून आता वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे.

आयुक्तांनी नव्याने निविदा मागवल्या आणि त्यात बचत गटांना सहभागी होऊ देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, महासभेचा ठराव शासनाकडे पाठविलाच का यावरून वाद सुरू आहे. हा वाद लॉक डाऊन नंतर आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद असणाऱ्यास हरकत नाही मात्र तो विद्यार्थी हिताचा असला पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण