शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:29 IST

चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयात देहदान आणि नेत्रदान मुथा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास

नाशिक : चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार, नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयात देहदान आणि नेत्रदान करण्यात आले. रजनीतार्इंच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक क्षेत्रातील मोठा आधारवड कोसळला आहे. दोन ते तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शहरातील मुथा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

दुपारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंडित कॉलनीतील प्रबोधिनी विद्या मंदिर येथे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. रजनीताई या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका निशिगंधा वाड यांच्या मावशी तर ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. नाशिकच्या सामाजिक चळवळीतील रजनीतार्इंचे योगदान संस्मरणीय आहे. प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. रजनीनाई उच्चशिक्षित होत्या. तत्कालीन ११ वी बोर्डात त्या ठाणे जिल्ह्णात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये एमएबीएडचे शिक्षण घेतले.

२५ वर्ष त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून अध्यापन केले. १९८९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन प्रबोधिनीच्या कामाला वाहून घेतले. त्यांचा मुलगा गौतम विशेष मुलांपैकी एक असून त्याच्या शिक्षणासाठी आलेल्या अडचणींमुळे त्यांनी १ जानेवारी १९७७ साली कुसुमताई ओक आणि डॉ. शिरीष सुळे यांच्या मदतीने सर्कल सिनेमा आवारात विशेष मुलांसाठीची पहिली शाळा ‘प्रबोधिनी विद्या मंदिर’ नावाने सुरू केली. विशेष मुलांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ‘जागर’, ‘ध्यानीमनी’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गोडुली गाणी (बालकांची गाणी) हा त्यांचा बालगीतांचा संग्रहदेखील आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची शासनाने दखल घेत १९८७ मध्ये तत्कालीन राष्टÑपती आर व्यंकटरामन यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने तर १९८८ मध्ये राज्य शासनाच्या वतीने दलित मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

याशिवाय नाशिक महापालिकेने लोककल्याण (१९९९) आणि संस्कृती वैभव संस्थेच्या वतीनेही (२००७) त्यांना गौरविले होते. त्यांनी लिहिलेले विशेष लेख राज्य पातळीवर गाजले आहेत. १९९४ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्टÑीय सहाव्या परिसंवादात त्यांनी ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची राज्य आणि राष्टÑीय पातळीवर विविध पदांवर नियुक्तीही झाली होती. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.