स्वत:हून काढून घेतले अतिक्रमण
By Admin | Updated: June 1, 2014 01:23 IST2014-06-01T00:31:59+5:302014-06-01T01:23:53+5:30
रहिवाशांचे लोटांगण : राजीवनगरला अतिक्रमण हटाव मोहीम

स्वत:हून काढून घेतले अतिक्रमण
रहिवाशांचे लोटांगण : राजीवनगरला अतिक्रमण हटाव मोहीम
इंदिरानगर : राजीवनगर झोपडपीलगत असलेल्या १०० फुटी रस्त्याला रुंदीकरणास अडथळा ठरणार्या सुमारे चाळीस अनधिकृत टपर्या आणि घरे रहिवाशांनी स्वत:हून काढून घेत पालिकेसमोर लोटांगण घातले.
सुमारे १० वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणा महामार्गास ये-जा करण्यासाठी राजीवनगर झोपडपी, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर मार्गे रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु काही जमीन हस्तांतरण करणे आणि अनधिकृत टपर्या व घरांमुळे अर्धवटच रस्ता राहिला होता. त्यानंतर राजीवनगर झोपडपीत झोपड्या टाकण्यास जागा न राहिल्याने सर्रासपणे १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृतपणे टपर्या आणि घरे बांधण्यात आली. त्यामुळे १०० फुटी रस्ता सुमारे चाळीस फूट राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. अखेर सिंहस्थापूर्वीच कामामध्ये पुन्हा १०० फुटी रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले. त्यामुळे आज सकाळी ९ वाजता अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नगररचना विभागाने रस्त्यास अडथळा ठरणार्या टपर्या आणि घरास मार्किंग करून दिले. तेव्हा नुकसान होऊ नये म्हणून १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सुमारे चाळीस टपर्या आणि घरे रहिवाशांनी स्वत:हून काढून टाकल्या. तसेच राहिलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. सदर मोहीम उपआयुक्त आर. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपआयुक्त वाडेकर, दिलीप सुरासे यांसह कर्मचार्यांनी केली.