शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बीज रूजलं रूजलं काळया आईच्या उदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:01 IST

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .

ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .चांगले पीक पाणी येईल अशी आशा शेतकरी वर्गात आहे. बैल जोडीची संख्या कमालीची घटली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची कामे उरकावली आहेत. वेळेची बचत होत असल्याने ट्रॅक्टरला जास्त प्रमाणात पसंती देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेत गेल्या दोन आठवड्यापासून सुरू झालेली पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे व शाळांना अद्यापही सुट्ट्या असल्यामुळे परिवारातील सर्वच सदस्यांनी शेतहीवर्तत हजेरी लावत पेरणीची कामात सहभाग नोंदविला आहे. गाव शिवारातील पेरणीची व इतर कामे करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. संचारबंदी नियमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर ठरले आहेत. कामावर जाताना तोंडाला मास्क लावत तसेच स्करपचा वापर करत काळजी घेतली जात आहे. सध्या मका, बाजरीसह खरीप पिकांची पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तरी आगाऊ पेरणी करण्यात आलेल्या मका व पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मका पिकाची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वडनेरसह काटवण परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मक्याचे क्षेत्र वाढले आहे.पाडळदे परिसरात पेरणीची कामे पूर्णपाडळदे : पाडळदेसह परिसरातील शेरूळ , हिसवाळ, कळवाडी देवघट भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर केली आहेत. मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस बºयापैकी झाला. परिसरात रोज रिमझिम होत असतो. काल वादळी वाºयासह जोरात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आठ दिवसापासून थोड्याफार प्रमाणात रोज पाऊस पडतो त्यामुळे पेरणीची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. आता कोळपणीला सुरु वात होईल. कपाशी, बाजरी ज्वारी व कडधान्य काही प्रमाणात मका इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकरी रोज सकाळी लवकर उठून आपली न्याहारी बांधून शेतामध्ये काम करताना दिसून येतो. सिंचनाची सोय नसल्याने पाहिजे तसं उत्पन्न घेता येत नाही. कारण परिसरातील संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस कधी जास्त कधी कमी कधी अवर्षणग्रस्त अशी परिस्थिती निर्माण होत असते. पाणी पातळीत वाढझालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे येथील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे. शेतकरी थोडयाफार प्रमाणात आपल्या शेतीला सिंचन ही करू शकतो. परिसरात पूर्वापार चालत आलेली पद्धतच शेतकरी राबवताना दिसून येतो. त्यामुळे अधिकच कष्ट करावे लागतात. आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे त्यामुळे उत्पन्नात अधिक भर पडू शकते पण तसे करतांना येथील शेतकरी अजून दिसून येत नाही. फक्त १५ ते २० टक्के शेतकरी ठिबकचा वापर करताना दिसून येतो.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस