शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

बीज रूजलं रूजलं काळया आईच्या उदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:01 IST

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .

ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .चांगले पीक पाणी येईल अशी आशा शेतकरी वर्गात आहे. बैल जोडीची संख्या कमालीची घटली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची कामे उरकावली आहेत. वेळेची बचत होत असल्याने ट्रॅक्टरला जास्त प्रमाणात पसंती देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेत गेल्या दोन आठवड्यापासून सुरू झालेली पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे व शाळांना अद्यापही सुट्ट्या असल्यामुळे परिवारातील सर्वच सदस्यांनी शेतहीवर्तत हजेरी लावत पेरणीची कामात सहभाग नोंदविला आहे. गाव शिवारातील पेरणीची व इतर कामे करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. संचारबंदी नियमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर ठरले आहेत. कामावर जाताना तोंडाला मास्क लावत तसेच स्करपचा वापर करत काळजी घेतली जात आहे. सध्या मका, बाजरीसह खरीप पिकांची पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तरी आगाऊ पेरणी करण्यात आलेल्या मका व पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मका पिकाची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वडनेरसह काटवण परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मक्याचे क्षेत्र वाढले आहे.पाडळदे परिसरात पेरणीची कामे पूर्णपाडळदे : पाडळदेसह परिसरातील शेरूळ , हिसवाळ, कळवाडी देवघट भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर केली आहेत. मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस बºयापैकी झाला. परिसरात रोज रिमझिम होत असतो. काल वादळी वाºयासह जोरात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आठ दिवसापासून थोड्याफार प्रमाणात रोज पाऊस पडतो त्यामुळे पेरणीची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. आता कोळपणीला सुरु वात होईल. कपाशी, बाजरी ज्वारी व कडधान्य काही प्रमाणात मका इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकरी रोज सकाळी लवकर उठून आपली न्याहारी बांधून शेतामध्ये काम करताना दिसून येतो. सिंचनाची सोय नसल्याने पाहिजे तसं उत्पन्न घेता येत नाही. कारण परिसरातील संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस कधी जास्त कधी कमी कधी अवर्षणग्रस्त अशी परिस्थिती निर्माण होत असते. पाणी पातळीत वाढझालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे येथील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे. शेतकरी थोडयाफार प्रमाणात आपल्या शेतीला सिंचन ही करू शकतो. परिसरात पूर्वापार चालत आलेली पद्धतच शेतकरी राबवताना दिसून येतो. त्यामुळे अधिकच कष्ट करावे लागतात. आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे त्यामुळे उत्पन्नात अधिक भर पडू शकते पण तसे करतांना येथील शेतकरी अजून दिसून येत नाही. फक्त १५ ते २० टक्के शेतकरी ठिबकचा वापर करताना दिसून येतो.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस