शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

‘देखते हैं उज्जैन कुंभमे हमें कौन रोकेगा’

By admin | Updated: September 26, 2015 23:01 IST

नाशिक वादाची धग उज्जैनला, दिगंबर आखाड्याच्या महंतांचा एल्गार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणी पार पडल्यानंतर दिगंबर अनी आखाड्यात परपरेनुसार ध्वज उतरविण्यात आला असून, तिन्ही अनी आखाडे अधिकाराबाबत स्वतंत्र आहेत. त्यामुळे ध्वज उतरविल्याचे कारण पुढे करीत आम्हाला उज्जैनच्या कुंभमेळ्यात कुणीही रोखू शकत नसल्याचे दिगंबर आखाड्याच्या महंतांकडून सांगण्यात आले आहे. ‘देखते हैं उज्जैन कुंभमें हमे कौन रोकेगा’ अशा शब्दात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. दिगंबर अनी आखाड्याकडून पर्वणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ध्वज उतविण्यात आला होता. यावर महंत ग्यानदास यांनी दिगंबर आखाड्याला उज्जैन कुंभमेळ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यांना आम्ही आखाडा परिषदेचे अध्यक्ष मानत नसल्याने ते काहीही बोलले तरी त्याचा उपयोग काय? असे सांगत दिगंबर अनी आखाड्यांच्या महंतांनी त्यांचा समाचार घेतला आहे. तिसऱ्या स्नानानंतर कुंभमेळा पूर्ण होऊन जातो. त्यानंतर ध्वज उतरविण्याचा निर्णय अनी आखाडे घेतात. त्यासाठी कुणाला विचारण्याची गरज नसते. आखाड्याच्या ध्वजारोहणासाठी तिन्ही अनीचे महंत एकमेकांकडे जातात. त्यानुसार दिगंबर आखाड्याने परंपरांचे पालन करीत ध्वज उतरविला आहे. ज्याच्या मागे १३ आखाड्यांपैकी दोनच आखाडे आहेत, कायदेशीर अध्यक्ष आहेत की नाही याबाबत साशंकता आहे, त्यांच्या बोलण्याला अर्थ काय? अशा शब्दात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आखाडा परिषद अध्यक्षांना अधिकार पत्र दिलेले नाही. दिगंबर आखाड्याने तेही वापस घेतल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. शाहीस्नानापूर्वीच दिगंबर आखाड्याने याबाबत प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यामुळे अध्यक्षांचा प्रश्नच शिल्लक राहात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उज्जैनच्या कुंभमेळ्यात नाशिक कुंभमेळ्यातील वादाची धग जाणवणार आहे. (प्रतिनिधी)