शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द

By sanjay.pathak | Published: May 23, 2018 1:02 AM

रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सेझमध्ये रतन इंडिया बरोबर एमआयडीसी भागीदार असून, त्यांनीदेखील या प्रकल्पाला वाºयावर सोडले आहे.

नाशिक : रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सेझमध्ये रतन इंडिया बरोबर एमआयडीसी भागीदार असून, त्यांनीदेखील या प्रकल्पाला वाºयावर सोडले आहे.केंद्र सरकारने एसईझेड प्रकल्प मंजूर केल्यानंतर नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव आणि गुळवंच येथे हा प्रकल्प साकारण्याचे ठरल्यानंतर त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजेच या प्रकल्पाच्या संचलनासाठी विशेष उद्देश वाहन अशी एक कंपनी करण्यात आली. त्यात राज्य औद्योगिक विकास महामंडळाला भागीदार करण्यात आले.  सिन्नरसारख्या दुष्काळी भागात हा प्रकल्प साकार करताना भूसंपादनात तत्कालीन एमआयडीसीनेदेखील मोठा सहभाग दाखवला होता. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राचे संपादन केल्यानंतर रेल्वे रूळलाइनसाठी देखील त्यावेळी एमआयडीसीचा पुढाकार होता. मात्र, कालांतराने इंडिया बुल्समधून बाहेर पडलेल्या रतन इंडियाने त्याची सूत्रे घेतली आणि कामकाज सुरू केले. त्याचवेळी एमआयडीसीनेदेखील काढता पाय घेतला.  राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाले, त्याचवेळी रतन इंडियाने सिन्नरमध्ये पहिल्या टप्प्यातील २७० मेगावॉटचा एक संच असे पाच संच तयार केले. त्यासाठी विदेशी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आणि वीजनिर्मितीची चाचणी घेतली. सेझमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे विजेचा होता. त्यानंतर अन्य कंपन्यांसाठी सुमारे सोळाशे भूखंड होते, त्यावर अन्य कंपन्यांना संधी देण्यात येणार होती. दुसºया टप्प्यातही रतन इंडिया याच प्रकल्पात १३५० मेगावॉटची निर्मिती करणार होती. म्हणजेच नाशिकच्या सेझमध्येच तब्बल २७०० मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट होते. परंतु पहिल्या टप्प्यातच वीजनिर्मिती करूनही त्यातून काहीच हाती न आल्याने रतन इंडियाने आपला दुसरा प्रकल्प गुंडाळला आहे.पहिल्या प्रकल्पावरच कंपनीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले होते. हे कर्ज खाते एनपीएमध्ये गेल्याने प्रकल्पावर अखेरीस पॉवर फायनान्स कार्पोरेशनने ताबा घेतला आहे.एमआयडीसी बघ्याच्या भूमिकेतया प्रकल्पात औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्न होणे आवश्यक होते. तसे तर झाले नाहीच शिवाय या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज राज्य सरकारने खरेदी करावी यासाठी महामंडळ अथवा उद्योग मंत्रालयामार्फत देखील कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.  रतन इंडियाचा पहिला प्रकल्प साकारल्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज राज्य सरकारने खरेदी करणे अपेक्षित होते. कोणत्याही खासगी वीज उत्पादकाची वीज सरकार खरेदी करते आणि मग ती वीज वितरित केली जाते. खासगी उत्पादकाला वीज परस्पर खासगीस्तरावर विकता येत नाही. अशी परिस्थती असल्याने राज्य सरकारने वीज खरेदी करणे क्रमप्राप्त होते.

टॅग्स :electricityवीज