शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

हंगाम : आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

By admin | Updated: February 24, 2016 22:48 IST

वसाका देणार १५०५चा पहिला हप्ता

नाशिक : अवसायानातून सुरू झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने पहिल्याच वर्षात उद्दिष्टापेक्षा किंचित जास्तच उसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचा हंगाम चालू राहणार असून आधी निश्चित केलेल्या एक लाखापेक्षा ५० हजार मे. टन जादाचे गाळप कारखाना वेळेत पूर्ण करेल, अशी माहिती प्रशासकीय मंडळातील सदस्य जि.प. सभापती केदा अहेर यांनी दिली.केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे एकूण गाळपाच्या साडेनऊ टक्के साखरेचे प्रमाण (उतारा) असेल तर किमान २३०० रुपये हमीभाव देण्याचे आदेश आहेत; मात्र वसाकाची गाळपाची सरासरी पाहता वसाकाचा सारखेचा उतारा (रिकव्हरी) साडेदहा टक्क्याच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उसाला २५४२ रुपये भाव देण्याची तयारी आहे. (पान ७ वर)त्यात ऊस वाहतूक दर कमी करण्यात येऊन हे दर १९५० च्या आसपास राहतील. ऊस वाहतूक दर ५७४ रुपये इतके राहतील, शिवाय जाड आणि बारीक साखरेच्या उत्पादनात ६० टक्के एम-३० तर ४० टक्के एस-३० साखरेचे उत्पादन करण्यात येईल. एम-३० साखरेला तुलनेने १०० रुपये जादाचे भाव असतात. आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून ४९ हजार मे. टन सारखेचे पोते तयार आहेत. या साखरेच्या पोत्यावर राज्य शिखर बॅँकेचा २०० रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ३०० रुपये बोजा आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचे गाळप सुरू राहणार असून या कार्यकाळात दीड लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वसाकातील कामगारांना या हंगामाचा तत्काळ अग्रीम देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक बी. बी. देसले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याच्या गाळपाच्या उद्घाटनालाच कारखाना सुरू झाला, आता मात्र तो असाच कायम सुरू राहील, याची जबाबदारी आमदार डॉ. राहुल अहेर, केदा अहेर व या परिसरातील शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)