शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

हंगाम : आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

By admin | Updated: February 24, 2016 22:48 IST

वसाका देणार १५०५चा पहिला हप्ता

नाशिक : अवसायानातून सुरू झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने पहिल्याच वर्षात उद्दिष्टापेक्षा किंचित जास्तच उसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचा हंगाम चालू राहणार असून आधी निश्चित केलेल्या एक लाखापेक्षा ५० हजार मे. टन जादाचे गाळप कारखाना वेळेत पूर्ण करेल, अशी माहिती प्रशासकीय मंडळातील सदस्य जि.प. सभापती केदा अहेर यांनी दिली.केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे एकूण गाळपाच्या साडेनऊ टक्के साखरेचे प्रमाण (उतारा) असेल तर किमान २३०० रुपये हमीभाव देण्याचे आदेश आहेत; मात्र वसाकाची गाळपाची सरासरी पाहता वसाकाचा सारखेचा उतारा (रिकव्हरी) साडेदहा टक्क्याच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उसाला २५४२ रुपये भाव देण्याची तयारी आहे. (पान ७ वर)त्यात ऊस वाहतूक दर कमी करण्यात येऊन हे दर १९५० च्या आसपास राहतील. ऊस वाहतूक दर ५७४ रुपये इतके राहतील, शिवाय जाड आणि बारीक साखरेच्या उत्पादनात ६० टक्के एम-३० तर ४० टक्के एस-३० साखरेचे उत्पादन करण्यात येईल. एम-३० साखरेला तुलनेने १०० रुपये जादाचे भाव असतात. आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून ४९ हजार मे. टन सारखेचे पोते तयार आहेत. या साखरेच्या पोत्यावर राज्य शिखर बॅँकेचा २०० रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ३०० रुपये बोजा आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचे गाळप सुरू राहणार असून या कार्यकाळात दीड लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वसाकातील कामगारांना या हंगामाचा तत्काळ अग्रीम देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक बी. बी. देसले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याच्या गाळपाच्या उद्घाटनालाच कारखाना सुरू झाला, आता मात्र तो असाच कायम सुरू राहील, याची जबाबदारी आमदार डॉ. राहुल अहेर, केदा अहेर व या परिसरातील शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)