शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता पहिलीसाठी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:41 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.राज्यभरातील विविध शाळांमध्ये १ मे रोजी शाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून शाळेचा निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये दोन दिवस अगोदरच विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहुतांशी शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी यावेळी परीक्षा संपल्यानंतर तत्काळ निकालपत्र तयार करून ठेवले असून जवळपास सर्व शाळांची निकाल प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्या व परीक्षा २० एप्रिलपूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहे. आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांकडून शून्य ते ६ व ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.डोनेशनमुळे शिक्षणाचा बाजारशैक्षणिक वर्ष २०१८-१९चे दुसरे सत्र संपत आल्याने विविध कारणांनी पाल्याची शाळा बदलू इच्छिणाºया पालकांना नवीन शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देणे कठीण झाले आहे. अनेक शाळांकडून पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २५ हजार ते ५० हजार रुपयांचे डोनेशन मागितले जाते. त्याचप्रमाणे नर्सरीसह पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या प्रवेशासाठीही पालकांकडून अशाप्रकारे डोनेशनची मागणी होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु, शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांकडून शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार सुरू झाला आहे.स्थलांतरितांना  १५ जूननंतर प्रवेशनव्याने शाळेत दाखल होणाºया पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असली तरी विविध कारणांनी स्थलांतरित झाल्यामुळे शाळा बदलावी लागणाºया विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूननंतर प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष ६ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू राहणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा