शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इयत्ता पहिलीसाठी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:41 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.राज्यभरातील विविध शाळांमध्ये १ मे रोजी शाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून शाळेचा निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये दोन दिवस अगोदरच विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहुतांशी शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी यावेळी परीक्षा संपल्यानंतर तत्काळ निकालपत्र तयार करून ठेवले असून जवळपास सर्व शाळांची निकाल प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्या व परीक्षा २० एप्रिलपूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहे. आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांकडून शून्य ते ६ व ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.डोनेशनमुळे शिक्षणाचा बाजारशैक्षणिक वर्ष २०१८-१९चे दुसरे सत्र संपत आल्याने विविध कारणांनी पाल्याची शाळा बदलू इच्छिणाºया पालकांना नवीन शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देणे कठीण झाले आहे. अनेक शाळांकडून पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २५ हजार ते ५० हजार रुपयांचे डोनेशन मागितले जाते. त्याचप्रमाणे नर्सरीसह पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या प्रवेशासाठीही पालकांकडून अशाप्रकारे डोनेशनची मागणी होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु, शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांकडून शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार सुरू झाला आहे.स्थलांतरितांना  १५ जूननंतर प्रवेशनव्याने शाळेत दाखल होणाºया पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असली तरी विविध कारणांनी स्थलांतरित झाल्यामुळे शाळा बदलावी लागणाºया विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूननंतर प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष ६ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू राहणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा