शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

दुष्काळामुळे कामाचा तुटवडा; मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:13 IST

बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजूर चालू वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालू असताना उपजीविका भागत होती; मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा व्यक्ती असल्याने गुजराण करायची कशी, हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे. त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सीमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लंबर, वीटभट्टीवरील मजूर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.ऊसतोड हंगामात यापूर्वी कुटुंबातील शाळकरी मुलांनाही आपल्या सोबत नेणारे मजूर सद्यस्थितीत मात्र आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना मुलांसोबत घरीच ठेवून त्यांची शाळा बुडणार नाही, याची काळजी घेताना दिसतात. पाच ते सहा गावे सोडून पोटापाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतू लागले आहेत. आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या उसाच्या बांड्यामुळे गुराढोरांच्या चारापाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ