शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे कामाचा तुटवडा; मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:13 IST

बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजूर चालू वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालू असताना उपजीविका भागत होती; मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा व्यक्ती असल्याने गुजराण करायची कशी, हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे. त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सीमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लंबर, वीटभट्टीवरील मजूर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.ऊसतोड हंगामात यापूर्वी कुटुंबातील शाळकरी मुलांनाही आपल्या सोबत नेणारे मजूर सद्यस्थितीत मात्र आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना मुलांसोबत घरीच ठेवून त्यांची शाळा बुडणार नाही, याची काळजी घेताना दिसतात. पाच ते सहा गावे सोडून पोटापाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतू लागले आहेत. आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या उसाच्या बांड्यामुळे गुराढोरांच्या चारापाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ