शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

गंगापूर धरणातून पाणी आरक्षणासाठी महाजन यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:43 IST

यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नाशिक : यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अलीकडेच झालेल्या जिल्हाधिकाºयांकडील पाणी आरक्षणाच्या बैठकीत महापालिकेच्या पाणी आरक्षणावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. यंदा परतीचा पाऊस न झाल्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होण्यास व्यत्यय होऊ शकतो.याशिवाय पुढील वर्षी पावसाळा लांबल्यास नाशिककरांवर जलसंकट उभे राहू शकते, त्या पार्श्वभूमीवर मुबलक पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी महपौर भानसी यांच्याबरोबरच उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी केली आहे.  दरम्यान, नाशिक दौºयावर आलेलेल्या केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. नाशिक शहरात अरूंद आणि नादुरस्त रस्त्यांमुळे वाहतूकीची कोंडी होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवीन रस्ते तयार करण्याची गरज आहे. महापालिकेच्या वतीने भूसंपादन सुरूच असले तरी महापालिकेकडे अपुरा निधी असल्याने रस्त्याची कामे होत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या नूतनीकरणासरशंी केंद्र शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक शहराचा स्मार्ट शहरात समावेश असून, नाशिक शहराचे पर्यटन व भौगोलिक स्थानाचा विचार करता शहरात आवश्यक ते पूल आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी सर्वेक्षण करून खासगी संस्थेच्या मदतीने पाहणी अहवाल तयार करण्यात यावा. राज्य व राष्टÑीय महामार्गांवर आवश्यक आहे अशा ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल बांधावेत, नाशिक शहराच्या सर्व भागात रिंगरोड करावेत अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दिल्ली येथे बैठकीसाठी वेळ दिल्यास सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची तयारीदेखील महापौर भानसी यांनी दर्शविली आहे.नाशिक शहरातून वाहत जाणाºया पवित्र गोदावरी नदीलगत साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर विकसित केल्यास नदीचे संवर्धन होईल, त्याचप्रमाणे महाराष्टत पर्यटनाच्या दृष्टीने हा पथदर्शी प्रकल्प ठरेल, असेदेखील महापौरांच्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन