शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:54 IST

भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नाशिक : भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.गोल्फ क्लब मैदान येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, सरकारचे प्रयत्न चाललेत की, दंगल घडवून आणावी परंतु ते जमले नाही. शहरी नक्षलवाद वाढतोय म्हणून सांगितले, तेही शक्य झाले नाही. भीमा कोरेगाव करून पाहिले तेथेही काही झाले नाही. तिहेरी तलाक कायदा आणला. यामुळे मुस्लीम समाज उठाव करेल, असे त्यांना अपेक्षित होते; परंतु हेही झाले नाही. यानुसारच आर्थिक निकषांवरील दहा टक्के आरक्षण आले, परंतु त्यांची खेळी त्यांच्यावरच उलटली असल्याचे ते म्हणाले. दहा टक्के आरक्षण द्यायचे हा भाजपाचा गेम प्लॅन होता, असा आरोप करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, राज्यसभेत जेथे भाजपाचे बहुमत नाही तेथे हा प्रस्ताव फेटाळला जाईल आणि निवडणुकीत भाजपाला नवा मुद्दा मिळेल, या अपेक्षेने त्यांनी घटनादुरुस्तीचे विधेयक आणले, मात्र तेही मंजूर झाल्याने भाजपाची परिस्थिती ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती झाल्याचे आंबेडकर म्हणाले. आरक्षण जाहीर करताना १ हजार फुटाचे घर आणि ८ लाखांच्या आत उत्पन्न या निकषात सवर्ण बसत नसल्याने त्याचा फायदा हा मुस्लिमांनाच अधिक होणार असल्याने आगामी निवडणुकीत सवर्ण भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे आंबेडकर म्हणाले.आंबेडकर यांनी मोदी यांच्या धोरणावर टीका करताना भाजपामुळेच देशाची अवस्था बिघडल्याचा आरोप केला. या अगोदरच्या सरकारने रिझर्व्ह बॅँकेच्या गंगाजळीला हात लावला नव्हता. परंतु मोदी सरकार गंगाजळीला हात लावायला निघाले आहे. बॅँकेत ज्यांचे खाते आणि फिक्स डिपॉझिट आहे त्यांच्यासाठी ही गंगाजळी ही सुरक्षित व्यवस्था असते, ही व्यवस्थाच भाजपा मोडीत काढायला निघाले आहे. जीएसटी, नोटाबंदीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीत आली आहे.देशाला हिंदू धर्म आणि हिंदू राष्टÑ करण्याच्या नादात बिघडवू नका, असा सल्ला देतानाच पंतप्रधान, चीफ जस्टीस, राष्टÑपती, तीनही आर्मी चीफ हे धर्म कधीही सांगत नाही. पण ते हिंदूच असतात अशी परिस्थिती आजची आहे. देशाचा धर्म हिंदू असावा, असे सांगणारेच देश बुडवायला निघाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.बहुजन आघाडीने महाराष्टÑाचे राजकारण हादरलेराज्यभर होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या सभांमुळे महाराष्टÑाचे राजकारण हादरले असून, ही आघाडी तोडण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केले जात आहेत, असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. 

टॅग्स :Politicsराजकारणreservationआरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर