शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

शनिवार पासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:12 IST

नाशिक : १७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५० वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३) पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवस चालणा-या या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी नाट्यलेखक दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.शनिवार (दि. २३) आणि रविवार ...

नाशिक : १७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५० वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३) पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवस चालणा-या या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी नाट्यलेखक दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.शनिवार (दि. २३) आणि रविवार (दि. २४) या दोन दिवसीय साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार असून या महोत्सवाची सुरूवात ग्रंथदिंडीने होणार आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्र्यंबकरोड येथील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला सुरूवात होणार असून सकाळी ११ वाजता या साहित्य संमेलनाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन होणार आहे. दोन दिवस चालणा-या या संमेलनात विविध विषयावरील परिसंवादासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुस-या सत्रात ‘नाटक : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यात ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे (पुणे) आणि लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांचा समावेश असणार आहे, तसेच यानंतर ‘कविता : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांचा समावेश असणार आहे. परिसवांदानंतर जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा साहित्यप्रवास उलगडून दाखविणा-या स्लाईड शोचे सादरीकरण करण्यात येणार आहे तसेच मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ कवियत्री रेखा भंडारे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे.साहित्य मेळाव्याच्या दुस-या दिवसाची सुरूवात मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या बीज भाषणाने होणार असून यानंतर ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवादात समीक्षक मंदार भारदे (मुंबई) आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र मलोसे (चांदवड) उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात साहित्यिक मेळाव्याच्या पार्श्वभुमीवर आयोजित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यानंतर गेल्या ४९ वर्षात जिल्हा साहित्यिक मेळाव्याने काय दिले ? या संवादपर कार्यक्रमातुन मान्यवर आपापले अनुभव कथन करणार आहेत.