शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:28 IST

गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धा : जलसंधारण, मृदसंधारणाचे होणार कामेग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी

नाशिक : सिने अभिनेता अमीर खान यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणी टंचाईचा सामना करणा-या चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पाणी फाऊंडेशनच्यावतीने ‘वॉटर कप’स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणा-या राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणा-या ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाऊंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणा-या ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाऊंडेशनला कळवायची असून, फाऊंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाऊंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे, या शिबीरात सहभागी होणा-या शिबीरार्थींचा प्रवास, राहण्याची खाण्याची व निवासाची सोय फाऊं डेशन करणार असून, शिबीरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे करायची आहेत, या कामांसाठी मात्र फाऊंडेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन ही कामे पुर्ण करावी लागणार असून, पाणी फाऊंडेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखाचे पारितोषित दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षिस देण्यात येईल.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक