शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सुखप्राप्तीसाठी सत्संग आवश्यक: महंत स्वामी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 1:15 AM

आपल्या सभोवताली कोणीही सुखी असल्याचे आढळत नाहीत. सुखाच्या प्राप्तीसाठी मंदिर आणि सत्संगांची आवश्यकता असून, केवडीबन येथे साकारण्यात येणारे बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे मंदिर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी शनिवारी (दि. ११) शिलान्यास सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देभव्य शिखरबद्ध मंदिर साकारणार मंदिराचा शिलापूजन विधी वैदिक मंत्रोच्चाराने शिलापूजन

नाशिक : आपल्या सभोवताली कोणीही सुखी असल्याचे आढळत नाहीत. सुखाच्या प्राप्तीसाठी मंदिर आणि सत्संगांची आवश्यकता असून, केवडीबन येथे साकारण्यात येणारे बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे मंदिर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी शनिवारी (दि. ११) शिलान्यास सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.  पंचवटी परिसरातील तपोवन (केवडीबन) येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) यांच्यातर्फे भगवान स्वामीनारायण यांचे भव्य शिखरबद्ध मंदिर साकारण्यात येणार असून, शनिवारी या मंदिराचा शिलापूजन विधी संस्थेचे सहावे आध्यात्मिक गुरू ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना महंत स्वामी महाराज यांनी जे भक्त या मंदिरात येऊन देवाची आराधना करतील तसेच नियमात राहून आपले जीवन व्यतित करतील त्यांना निश्चितच शाश्वत सुखाचा आनंद प्राप्त होईल, असे सांगितले. यावेळी ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्यासह वरिष्ठ संत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चाराने शिलापूजन करण्यात आले.  शिलापूजन विधीसाठी देशभरातून अनेक भक्त याठिकाणी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित हजारो भक्तांना छोट्या आकारातील शिला देऊन पारंपरिक पद्धतीने महंत स्वामी महाराज तसेच वरिष्ठ संत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात हा विधी संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनता सुखी आणि समृद्धी रहावी यासाठी संस्थेने फक्त मंदिराची उभारणी न करता समाजोपयोगी शाळा, वसतिगृह, रुग्णालयांची निर्मिती करण्यात येते हा चांगला उपक्रम असून, यामुळे संस्कार आणि संस्कृती या दोघांचे जतन होत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.अशी आहे ‘बीएपीएस’ संस्था ब्रह्मस्वरूप शास्त्री महाराज यांनी १९०७ साली बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेची (बीएपीएस) स्थापना केली. भगवान स्वामी नारायण यांच्या वैदिक आदर्शांना केंद्रस्थानी ठेवून या संप्रदायाच्या कार्याला प्रवाहित केले आहे. आज या संप्रदायाचे कार्य नऊ हजारांहून अधिक सत्संगाद्वारे संपूर्ण जगभरात सुरू आहे. यामध्ये संस्कारधाम, मंदिरनिर्मिती, बालसंस्कार, युवा युवती संस्कार, महिला कल्याण केंद्र आणि सत्संग केंद्र अशा विविध कार्यांचा समावेश आहे.