शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी जाणार ’शिवशाही’ थाटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 9:37 PM

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे ...

ठळक मुद्देपायी दिंडीला परवानगी नाही; बसमधील प्रवाशी संख्या जिल्हाधिकारी ठरवणार; परंपरा खंडीत होऊ नये म्हणून पादुका गर्भगृहातून पालखीत

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे रवाना होत असतो. मात्र, यंदा कोरोना महामारीचे संकट असल्याने दिंडी सोहळा स्थागित केला आहे. त्याऐवजी आषाढ शु. दशमीला शिवशाही बसमधून निवृत्तिनाथांची पालखी ३0 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.बसमध्ये पन्नास प्रवासी बसण्याची क्षमता असली तरी पालखीसोबत कोण आणि किती भाविक जाणार याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यामुळे नाथांच्या भाविकांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. विश्वस्त, टाळकरी, विणेकरी तसेच मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर आषाढ दशमी (दि.३0) मुक्काम व दुस-या दिवशी आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्राा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर दुस -या दिवशी उपवास सोडल्यानंतर पालखी पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासास प्रयाण करणार आहे.परंपरेनुसार निवृत्त्तिनाथांच्या पादुका गर्भगृहातून बाहेर काढण्यात येतील. पूजाविधी केला जाईल. यानंतर संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आषाढ शु.दशमी पर्यंत पादुका सभा मंडपात ठेवण्यात येतील. मधल्या काळात दररोज विधीवत पूजाअर्चा होत जाईल.असा यंदाच्या पंढरपूर वारीचा कार्यक्र म आहे. राज्य शासनाच्या आदेशाचा आदर करु न विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पंडितराव कोल्हे रामभाऊ मुळाणे, पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे, संदीप शिंदे यांच्या संमतीनेच शिवशाही बसनेच पालखी नेण्याचे निश्चित झाले. दरम्यान पालखी समवेत समाधी संस्थानचे मानकरी मनोहर महाराज, बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज, गोसावी देहुकरमाऊली आदींसह विश्वस्त मंडळातील सदस्य, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक आदींचा समावेश असेल. पण किती लोक आणि कोण याचा निर्णय जिल्हाधिकारी ठरवतील.पालखी शिवशाही बसने थेट पंढरपूरला जाणार असल्याने व पादुका त्र्यंबकेश्वर येथेच असणार असल्याने निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत गर्दी न करता त्र्यंबकेश्वर येथेच संपन्न होईल. संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरलाच पार पडणार असल्याची ही तिसरी वेळ आहे. याप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.- पवनकुमार भुतडा,श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरपालखीची परंपरा ठेवली कायम!बसमध्ये ५0 प्रवासी असतात. पण त्र्यंबकेश्वरहून किती लोक पाठवण्यास जिल्हाधिकारी परवानगी देतील ते सांगता येत नाही. बसमध्ये फिजिकल डिस्टिन्संगचा वापर करण्यात येईल. तसेच बस समवेत पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी करणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, पालखीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुका गर्भगृहातून काढून पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी ‘बोला पुंदलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. आता या ठिकाणी दैनंदिन पूजा-अर्चा-अभंग, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे