शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sanjay Raut: 'यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला', संजय राऊतांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:00 IST

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यात भाजपाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या, पण त्यात एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी मोदींचा आदेश पाळला नाही. अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

संजय राऊत आज पक्ष कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्याचाही उल्लेख करत राऊतांनी नाशिकच्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. जिथं पोहोचायचा होता तिथं नाशिकचा आवाज पोहोचला आहे. अख्ख्या देशात गेल्या ८ दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू होती. तुम्ही एफआयआर दाखल केलात तेव्हा मी भूवनेश्वरला होतो आणि तिथून परत आलो, असं संजय राऊत म्हणाले. 

यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा"राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती", असं संजय राऊत म्हणाले. 

"मोदींनी त्यांच्या नव्या मंत्र्यांना काय आदेश दिलेत ते मला जास्त माहित्येत. केंद्र सरकार करत असलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारच्या कामांचा प्रचार आणि प्रसार करा, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, असं मोदींनी सांगितलं आहे. पण एक अतिशहाणा मोदींचाही आदेश पाळत नाही. केंद्र सरकारचा प्रचार करण्याऐवजी शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत सुटला आहे. ते जेव्हापासून मंत्री झालेत तेव्हापासून भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच भाजप फक्त अर्ध्याफूटावर येईल", असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे