शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:45 IST

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मतदानाच्या वेळेत संबंधितांना शहरात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मतदानाच्या वेळेत संबंधितांना शहरात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.आदर्श आचारसंहितेच्या महिनाभराच्या कालावधीत एकूण ५५ गुंडांना शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार केले आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५५१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि.२४) शहर सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. तसेच सातपूरमधील संघटितपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या कल्पेश दीपक वाघ याच्यासह त्याच्या साथीदारांनाही शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर ९ गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकPoliceपोलिस