शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

मुंबईकरांना १५० टन भाजीपाला, फळांची विक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:42 IST

कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : आत्मा अंतर्गत स्थापन शेतकरी गटांचा उपक्र म

सिन्नर : कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून या उत्पादनांची रास्त दरात विक्र ी करण्यात येत आहे.कोरोनामुळे देशात आपत्ती जाहीर करण्यात आली असून, लॉकडाउनमुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. सर्वच ठिकाणी त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा जाणवत असून अनेकांनी या संधीचा फायदा घेत उखळ पांढरे करायला सुरुवात केली आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला, दूध वाहतूक आणि विक्री करायला परवानगी दिली असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असणाºया मुंबापुरीत सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये यासाठी तालुक्यातील वडगाव, सिन्नर, जोगलटेंभी व दोडी येथील शेतकरी बचतगटांनी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हे शेतकरी गट स्थापन करण्यात आले असून, उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मुंबईसाठी १५० टन भाजीपाला पुरविण्यात आला आहे.वडगाव सिन्नरच्या वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गटामार्फत आठवड्यातून तीन वेळा लक्ष्मीनगर (गोरेगाव), नर्सीपार्क(जुहू), शारण ग्रुप (वर्सोवा) येथे उमेशा ठक्कर यांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर जोगलटेंभी येथील बळीराजा शेतकरी बचतगटाने नंदिनी छाब्रिया व मुकुंद मेहरा यांच्या साहाय्याने ब्रीचकॅण्डी परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात व दोडी येथील शेतमाल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने विविध सोसायट्यांमध्ये भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे.आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांना मुंबईत भाजीपाला विक्र ीला पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी पुढाकार घेतला. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाट, हेमंत काळे यांनी वाहतूक परवान्यासह भाजीपाला विक्र ीसाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न