शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रेल्वे थांबे वाढविण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 8:58 PM

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ...

ठळक मुद्देबैठक : मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबत महाव्यवस्थापकांशी चर्चा

लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन फक्त कोविड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोविडच्या चाचण्या करून फिजिकल डिस्टन्स ठेवूनच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठरावीक ठिकाणीच कोविड स्पेशल रेल्वेचा थांबा असल्याने, अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नसल्याने, प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ.भारती पवार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचेशी नासिक रोड येथील स्थानकात बैठकीदरम्यान चर्चा केली.या चर्चेदरम्यान नांदगाव येथे प्रवाशांची व पासधारक प्रवासी व यात्रेकरू यांची वाढती संख्या लक्षात घेता, या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेचा थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल, तसेच मनमाड, नासिक ते मुंबई येथे प्रवास करणारे अनेक चाकरमानी नोकरीच्या निमित्ताने आपल्या कार्यालयात रोज जाऊन येऊन नोकरी करतात. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात घेता, त्यांच्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वेळेवर पोहोचता येईल, तसेच मनमाड रेल्वे स्टेशन हे रेल्वे जंक्शन आहे आणि धुळे, नगर जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तथा चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव या आसपासच्या परिसरातील जनतेलाही देशभरात अनेक ठिकाणी जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून सुविधा उपलब्ध आहे, परंतु रेल्वेसेवा बंद असल्याने, त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत, त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या या बैठकीप्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांनी मांडल्या. या बैठकीप्रसंगी विवेक गुप्ता, युवराज पाटील यांच्यासह अनेक रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मनमाड स्थानकातील कामे संथगतीनेमनमाड मोठे रेल्वे जंक्शन असून, तेथे मोठा गुरुद्वारा असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देशभरातून अनेक भाविक या गुरुद्वारास भेट देण्यासाठी येत असतात. मनमाड शहराचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मनमाडची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील रेल्वे रुग्णव्यवस्था अधिक चांगली व्हावी, अधिकच्या रुग्णसुविधा रुग्णांना मिळाव्या व रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण व्हावे, यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मनमाड रेल्वे स्थानकात जी विकासकामे चालू आहेत, ती अतिशय संथ गतीने चालू आहेत, त्याही कामास गती मिळावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे