शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संतांनी वेद वाङ्मयाची परंपरा जोपासली

By admin | Updated: August 23, 2015 23:54 IST

वेदमूर्तींचा सत्कार : वैदिक संमेलनात उमटला सूर

नाशिक : महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासह अनेक संतांनी वेद वाङ्मयाची परंपरा जोपासली. किंबहुना वेद वाङ्मयाचा विचार वृद्धिंगत झाला तो संत वाङ्मयातून असा सूर वैदिक संमेलनादरम्यान झालेल्या परिसंवादातून उमटला. पूर्णवाद परिवार व जगदगुरू शंकराचार्य महासंस्थानच्या वतीने आयोजित संमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी ‘वेद पारायण व शास्त्र चर्चा’ या विषयावर परिसंवाद झाला. गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वेदशास्त्र संपन्न विनायक शास्त्री जोशी, चंद्रशेखर जोशी, विवेकशास्त्री गोडबोले, अशोक कुलकर्णी यांनी परिसंवादामध्ये सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण जोशी होते. याप्रसंगी विवेकशास्त्री यांनी बोलताना सांगितले की, संत वाङ्मयाला वेद वाङ््मयाबाबत आदर असून, वेद व संत वाङ्मयात सांगितलेला विचार एकसमान आहे. संतांनी वेदांच्या रक्षणाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. जीवनात वेदाचे महत्त्व याविषयी अशोक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. संतांनी सांगितलेली वचने व वेदांमधील वचने यामधील असलेले साम्य चंद्रशेखर जोशी यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतातून वेदातील महत्त्व, स्थान, याविषयी श्रीकृष्ण जोशी यांनी विवेचन केले.दरम्यान, सकाळच्या सत्रात औरंगाबाद येथील आनंदराव मुठाळ यांचे ‘वैदिकाची ईश्वरधारणा’ या विषयावरील प्रवचनात वेदांचे व्यवहारावरील महत्त्व स्पष्ट केले. संध्याकाळच्या सत्रात विवेकशास्त्री यांनी ‘वेदसेवेसाठी उत्तम यजमान क से व्हावे’ याविषयी मार्गदर्शन केले.