शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

संतांनी जाती-जमातीच्या भिंती सैल केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:15 IST

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.

ठळक मुद्देतारा भवाळकर : दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे गुंफले पुष्प

नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात.कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे साठावे पुष्प परशुराम सायखेडकर सभागृहात गुरुवारी (दि.२०) भवाळकर यांनी ‘महिला संतांचे क्रांतिकारक कार्य’ या विषयावर गुंफले. यावेळी त्यांनी १२व्या शतकापासून भारतात झालेला संत संप्रदायाचा उगम, पुरुष संतांसोबत महिला संतांचे सामाजिक योगदान, लोकसंस्कृती, संत साहित्य, भाषा संस्कृती, महिला संतांची कामगिरी, असा चौफेर आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला.भवाळकर म्हणाल्या, या महाराष्टÑात संत परंपरा मोठी असली तरी या परंपरेत होऊन गेलेली संत स्त्रियांची मालिकाही तितकीच मोठी आहे. महाराष्ट्रातील लोकांना संत माहीत आहेत; मात्र महिला संतांविषयी फारशी माहिती नाही. महिला संत मालिकेतदेखील सर्व जाती-जमाती व पंथांच्या स्त्रियांचा समावेश आढळून येतो. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, विठाबाई, विठाई, निर्मलाबाई, बहिणाबाई अशी कितीतरी नावे संत स्त्रियांची घेता येतील.संत परंपरेत होऊ न गेलेल्या महिलांचे कार्यदेखील तितकेच क्रांतिकारक असल्याचे त्या म्हणाल्या. इतिहासाकडे सांस्कृतिक अंगाने बघितल्यास महिला संतांचे कार्य व त्यामधील सत्यतेचा प्रत्यय नक्कीच येतो. महाराष्टÑात उत्तर व दक्षिण भारतामधील संस्कृतीचा संगम झाल्याचे पहावयास मिळते.सगळे संत पंढरीचा राजा विठ्ठलाचे उपासक होते, असेही भवाळकर यांनी यावेळी सांगितले. संतांनी निर्माण केलेल्या पार्श्वभूमीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना सत्ता स्थापन करणे अधिक सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले.‘मराठी पाट्या’ आंदोलन गमतीदारमहाराष्ट्रात भाषाभाषांमध्ये भेदाभेद केला जातो, ही खंत व्यक्त करताना भवाळकर यांनी ‘मराठी पाट्या’ लावण्याचा हट्ट धरणाऱ्यांना चपराक लावली. मराठी पाट्यांसाठी झालेले आंदोलन गमतीदार असेच होते. एखाद्या दुकानावर इंग्रजीत झळकणारे नाव मराठी अर्थात देवनागरी लिपित झळकले म्हणजे मराठीत झळकले, असा गोड गैरसमज करून घेत राजकीय पुढाºयांनी आंदोलन केले ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लिपी बदलली म्हणजे भाषा बदलते असे अजिबात नाही, असे भवाळकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक