शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

By अझहर शेख | Updated: January 5, 2019 14:00 IST

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्देसांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये

नाशिक : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ‘सांदण’ सर करण्याचा थरार अनुभवण्यासाठी गिरीभ्रमंती करणाºया गिर्यारोहकांसह पर्यटकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. ‘सांदण’ दरी ही अकोले तालुक्यातील साम्रद गावात आहेत. हिवाळा असल्यामुळे सांदण सर करण्यास फारसा अडथळा येत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक या दरीला भेट देत दरीमधून चालण्याचा थरार अनुभवत आहेत. भंडारद-यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर सांदण दरी आहे. भंडारदरा धरणाच्या स्पीलवेलवरुन पुढे आल्यानंतर रतनवाडी फाट्यावरून कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटेवरुन रतनवाडीमार्गे साम्रद गावाच्या शिवारात सांदण दरी गाठता येते.

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अर्थात जमीनीला पडलेली मोठी भेग यामुळे ही दरी किंवा घळ निर्माण झाल्याचे बोलले जाते. सांदणचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून वृक्षराजीने नटलेला आहे. यामुळे सांदण दरी नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. सांदण दरी पावसाळ्यात बघणे अशक्य होते. प्रचंड धुके व दरीकडे जाणाºया वाटेत चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तवर सांदणचा मार्ग बंद केला जातो. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सांदण दरीचा थरार अनुभवणे शक्य होते. यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सांदणदरीमध्ये उतरू लागले आहेत. या दरीला भेट देताना निसर्गामध्ये कुठल्याहीप्रकारचा हस्तक्षेप पर्यटकांनी टाळावा तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, इतकीच माफक अपेक्षा गावकºयांकडून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण दरी पार केल्यानंतर समोर विराट कोकणकडा जणू सांदणप्रेमींचे स्वागतच करतो. त्याचे विराट सौंदर्यशाली रूपडे बघून मनाला मोहिनी न पडल्यास नवलचं. भंडारदरा टुरिझम संस्थेच्या वतीने पर्यटकांना भंडारदरा परिसरातील निसर्गसौंदर्य तसेच विविध पर्यटनकेंद्रांची माहिती तसेच मार्गदर्शन केले जात आहे. पर्यटकांनी भंडारदरा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात फिरताना कुठल्याहीप्रकारे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी जाण्याचा किंवा सेल्फी टिपण्याचा मोह करु नये, तसेच जंगलाच्या परिसरात विनाकारण पाऊलवाटा सोडून भटकंती करु नये, स्थानिक वाटाड्या तसेच संस्थेच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन रवी ठोंबाडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत हा सगळा परिसर येत असल्यामुळे वन-वन्यजीव विभागाच्या सर्व नियम या परिसराला लागू आहे. या भागात जाळपोळ करणे, मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणे, जैवविविधतेला त्रास होईल, असे कृत्य करणे भारतीय वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत अपराध ठरतो. त्यामुळे पर्यटकांनी कुठल्याही पध्दतीने निसर्गाला हानी पोहचवू नये, असे आवाहन नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे. निसर्गाला हानी पोहचवताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर वनविभागाच्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांचे पथक नियमीत स्वरुपात गस्तीवर असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकAhmednagarअहमदनगरtourismपर्यटन