शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:19 IST

सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे.

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. काजवारूपी प्रकाशफुलांच्या आविष्कारासाठी हे अभयारण्य राज्यात प्रसिद्ध आहे. चालू महिन्याच्या पंधरवड्यानंतर हा आविष्कार अभयारण्यातील वृक्षसंपदेवर बघावयास मिळणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना याचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.  वैशाख सरू झाला की या अभयारण्यामधील भंडारदरा ते राजूरपर्यंतच्या परिसरातील वातावरण बदलू लागते अन् मग निसर्गप्रेमींना चाहूल लागते ती सह्याद्रीच्या गिरिकंदात झगमणाऱ्या काजव्यांच्या दुनियेचे. वैशाखनंतर काजव्यांच्या उत्पत्तीचा काळ जवळ येतो. रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये काजवे चमकू लागतात. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील घाटघर-साम्रद व भंडारदरा-रतनवाडी या मार्गांवर काजव्यांची दुनिया पाहावयास मिळते. हा परिसर इगतपुरी व नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबईकर, नाशिककर तसेच पुणेकरांनाही संगमनेर-राजूरमार्गे हे अभयारण्य सोयिस्कर पडते. रोहिणी किंवा मृगाच्या सरी बरसल्या की जणू नभोमंडळातील तारकादळेच अभयारण्याच्या कुशीत उतरल्याचा भास होतो. चहुबाजूला विविध प्रजातीच्या झाडांवर काळ्याकुट्ट अंधारात काजव्यारूपी प्रकाशफुलांचा लखलखाट पाहावयास मिळतो. निसर्गाची ही अद्भुत किमया केवळ डोळ्यांच्या कॅमेºयात टिपता येते आणि या प्रकाशफुलांनी उजळलेले झाड डोळ्यांनी न्याहाळण्याची मजा काही औरच असते. दरवर्षी अभयारण्यात ही दुनिया अनुभवण्यासाठी महिनाभर निसर्गप्रेमींची वर्दळ पाहावयास मिळते. मुंबईकरांसह नाशिककर, पुणेकर व नगरकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या भागातील आदिवासी लोकांना रोजगारदेखील काही प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते. लक्ष-लक्ष काजव्यांचा नैसर्गिक आविष्कार डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो; मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे डोळे जणू हा आविष्कार बघून विस्फारतात की काय, अशी शंका येते. अशा विकृतांकडून असा अद्भुत नजारा अनुभवला तर जात नाही मात्र तो नजारा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी अशा विकृ त प्रवृत्तीच्या लोकांवर नाशिक वन्यजीव विभागाचा ‘वॉच’ राहणार आहे. ग्रामस्थ व गाइडच्या मदतीने वनविभाग पर्यटकांच्या धिंगाण्याला चाप लावणार आहे.पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावेचारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारून काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करून पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखलेली झाडे बघण्याची मजा लुटावी, असे आवाहन भंडारदरा, अकोले विभागातील निसर्गप्रेमींसह नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी केले आहे.

टॅग्स :forestजंगल