शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

पाणी योजनेसाठी तहसीलदारांना सर्वपक्षीय साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 1:17 AM

पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.सटाणा शहराचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी शहरासाठी केळझर प्रकल्पातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू करण्यात आलेले असताना प्रकल्प क्षेत्रातील नेते आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे ती योजना बारगळली.त्यानंतर सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाण्याचे आरक्षण करण्यात येऊन योजनेच्या निधीला मंजुरी दिली. मात्र पुनंद लाभक्षेत्रातील नेत्यांनी जलवाहिनीच्या कामास विरोध सुरू केल्याने ही योजना ही संकटात सापडली आहे.पुनंद पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देऊन पुनंद पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नितीन सोनवणे, मंगलसिंग जोहरी, मंगेश भामरे, बापू कर्डवाल, अब्दुल बोहरी, दादा इंगळे, रोशन सोनवणे, राजनसिंग चौधरी, विक्र ांत पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी