शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी कांद्याची विक्री करण्यासाठी धावपळ; कोरोना चाचणीसाठी शेतकऱ्यांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:41 IST

Onions Market News: बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत.

- संजय दुनबळेनाशिक : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाची तयारी आणि पावसात भिजून कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीकडे  कल वाढला असून, बहुतेक बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी होत आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाला गर्दी आवरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र, एकाच सत्रात केवळ ५०० वाहनांतील शेतमालाचा लिलाव होत असल्याने आपल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू  असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.  

कांद्याला मिळतोय सरासरी दर १,५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी मिळत असल्याने कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय नाही त्यांना पावसाळ्यापूर्वी कांदा विकणे गरजेचे असल्याने बाजार समित्यांमध्ये गर्दी होत आहे. सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी १५,००० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.  

चाचणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा : बाजार समिती आवारात येणाऱ्या प्रत्येक घटकाची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याने बाजार समित्यांच्या आवारात अँटिजन चाचणी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर चाचणी करून घेण्यासाठीही शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकदा केलेल्या चाचणीचा अहवाल आठ दिवस ग्राह्य धरला जात असल्याने ज्यांच्याकडे अधिक माल आहे, त्यांना वारंवार चाचणी करावी लागत आहे. 

पैशांची जमवाजमव करण्याचे आव्हान- मागील वर्षीपासून घोंगावणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे. - त्यात यावर्षी सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने खरीप हंगामाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांना उसनवारीने तर काहींना सावकाराकडून पैसे घ्यावे लागत आहेत. - ज्यांच्याकडे शेतमाल आहे ते माल विक्रीच्या तयारीत आहेत. मात्र, बाजार समित्यांना घालून दिलेल्या नियमांमुळे दररोज ५०० वाहनांतील मालाचाच लिलाव होत आहे.- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, खरिपासाठी भांडवल कसे उभे करावे, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.  

बंदमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान- लॉकडाऊनच्या काळात बंदमुळे भाजीपाल्याचे लिलावही बंद होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. - भाजीपाला नाशवंत असल्याने तो मिळेल त्या भावात विकण्यासाठीही शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता नाशिक बाजार समितीबाहेरच वाहने उभी केली होती. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी किमतीने माल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती